शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका  :  विजय कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:08 PM

युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका, आपले ध्येय निश्चित करा, काय करायचे आहे, त्याचा अभ्यास करा, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुथ एम्पॉवरमेंट समिट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका, आपले ध्येय निश्चित करा, काय करायचे आहे, त्याचा अभ्यास करा, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच बँकांमध्ये वाईट अनुभव आले तरी थांबू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.फॉर्च्युन फाऊंडेशनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका, इंजिनियरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या युथ एम्पॉवरमेंटमध्ये शुक्रवारी मार्गदर्शनपर सत्रामध्ये मुद्र्रा बँकिंग संदर्भातील माहिती देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. प्रा. अनिल सोले, ईसीपीएचे सचिव कुणाल पडोळे, नवनीतसिंह तुली, आशिष वांदिले उपस्थित होते.ऋण मागताना काय अभ्यास करावा याची माहिती देताना विजय कांबळे पुढे म्हणाले की, अनुदान मिळते म्हणून व्यवसाय करू नका, व्यवसायासंबंधीची माहिती कादगावर उतरवून त्याचे सर्वसाधारण अंदाजपत्र तयार करावे. हे सांगताना त्यांनी सीएची आवश्यकता नसल्याचेही विशेषत्वाने सांगितले.आपल्यातील आत्मविश्वास बँकेच्या व्यवस्थापकांची मानसिकता बदलवून त्यांना ऋण देण्यास भाग पाडेल, असा विश्वासही व्यक्त केला. कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळविण्याच्या दृष्टीने बँक आॅफ महाराष्ट्र आणि आपल्या कॅबिनचे दरवाजे नेहमी खुले असल्याचेही त्यांनी यावेळी विशेषत्वाने नमूद केले.फ्लाय अ‍ॅशच्या व्यवसायातून रोजगाराच्या संधी - सुधीर पालीवालवीज प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅश (राखड) निर्माण होते. ती मानवाच्या स्वास्थ्यासाठी हानीकारक असते. मात्र, त्याद्वारे बांधकामाच्या संबंधित वस्तूंची निर्मिती होऊ शकते. त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन प्रदूषणालाही आळा बसेल, असे मत महाराष्ट्र स्टेट फ्लाय अ‍ॅश कौन्सिलचे तज्ज्ञ सदस्य सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केले. फ्लाय अ‍ॅशच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.

टॅग्स :nagpurनागपूर