शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पाश्चिमात्य अन् भारतीय अन्नाची तुलना करू नका : बी. दिनेश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:16 IST

पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकुमार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्दे‘न्युट्रिकॉन २०१८’ परिषदेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकुमार यांनी आज येथे केले.न्युट्रिशन सोसायटी आॅफ इंडिया नागपूर चॅप्टर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘न्युट्रिकॉन २०१८’ या परिषदेचे आयोजन वनामतीच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभाग वर्धाचे सहायक आयुक्त डॉ. पुष्पहास बल्लाळ होते. सहअध्यक्ष म्हणून गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अभय इत्तडवार उपस्थित होते. डॉ. बी. दिनेशकुमार म्हणाले, अन्नच आपले औषध आहे. परंतु आपण अनेक वर्षांपासून पाश्चिमात्य पद्धतींचा आंधळेपणाने स्वीकार करीत आहोत. तेथील अन्न त्या नागरिकांच्या गरजेनुसार बनविण्यात येते. दोन वेगवेगळ्या अन्नामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊन आजार जडतात. युरोपीय देशात भारतीय अन्नपदार्थांना बंदी आहे. परंतु भारतात युरोपीयन अन्नपदार्थांसाठी खुला बाजार आहे. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून लवकरच सकारात्मक बदल होणार आहे. न्युट्रासुटिकल्स आणि पारंपरिक अन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत डॉ. बी. दिनेश कुमार यांनी व्यक्त केले. डॉ. पुष्पहास बल्लाळ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या न्युट्रासुटिकल्सच्या यादीतील अन्नपदार्थांबाबतच्या नियमात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्युट्रिशन (एनआयएन) हैदराबादचे वैज्ञानिक डॉ. एन. हरी शंकर यांनी ‘एनआयएन’मध्ये अन्नाच्या दुष्परिणामांचे परीक्षण कसे करण्यात येते, याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. सी.डी. मायी यांनी जैविक तंत्रज्ञानातून अन्नाला सशक्त करण्याच्या प्रयोगाबद्दल उदाहरणासह माहिती दिली. डॉ. राजीव मोहता यांनी भुकेची मानसिकता या विषयावर बोलताना वयोमानानुसार खाण्याच्या आवडीनिवडीत बदल होत असून मुले, आईवडिलांचे उद्बोधन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आभार डॉ. प्रकाश इटनकर यांनी मानले. यावेळी फार्मसी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. जास्मीन गेव्ह आवारी, समन्वयक डॉ. रेखा शर्मा, डॉ. सबिहा वली, मार्गदर्शक डॉ. ए. एन. राधा, परिषदेच्या आयोजक डॉ. कविता गुप्ता, डॉ. रेणुका माईंदे उपस्थित होत्या.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठmedicineऔषधं