शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पाश्चिमात्य अन् भारतीय अन्नाची तुलना करू नका : बी. दिनेश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:16 IST

पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकुमार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्दे‘न्युट्रिकॉन २०१८’ परिषदेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाश्चिमात्य लोकांचे अन्न हे तेथील वातावरण आणि नागरिकांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य अन्नाची भारतीय अन्नासोबत तुलना करून त्यांचे सेवन केल्यास आजारांचे प्रमाण वाढू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय आहार संस्था हैदराबादचे उपसंचालक डॉ. बी. दिनेशकुमार यांनी आज येथे केले.न्युट्रिशन सोसायटी आॅफ इंडिया नागपूर चॅप्टर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘न्युट्रिकॉन २०१८’ या परिषदेचे आयोजन वनामतीच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभाग वर्धाचे सहायक आयुक्त डॉ. पुष्पहास बल्लाळ होते. सहअध्यक्ष म्हणून गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अभय इत्तडवार उपस्थित होते. डॉ. बी. दिनेशकुमार म्हणाले, अन्नच आपले औषध आहे. परंतु आपण अनेक वर्षांपासून पाश्चिमात्य पद्धतींचा आंधळेपणाने स्वीकार करीत आहोत. तेथील अन्न त्या नागरिकांच्या गरजेनुसार बनविण्यात येते. दोन वेगवेगळ्या अन्नामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊन आजार जडतात. युरोपीय देशात भारतीय अन्नपदार्थांना बंदी आहे. परंतु भारतात युरोपीयन अन्नपदार्थांसाठी खुला बाजार आहे. याबाबत अन्न व औषधी प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून लवकरच सकारात्मक बदल होणार आहे. न्युट्रासुटिकल्स आणि पारंपरिक अन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत डॉ. बी. दिनेश कुमार यांनी व्यक्त केले. डॉ. पुष्पहास बल्लाळ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या न्युट्रासुटिकल्सच्या यादीतील अन्नपदार्थांबाबतच्या नियमात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्युट्रिशन (एनआयएन) हैदराबादचे वैज्ञानिक डॉ. एन. हरी शंकर यांनी ‘एनआयएन’मध्ये अन्नाच्या दुष्परिणामांचे परीक्षण कसे करण्यात येते, याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. सी.डी. मायी यांनी जैविक तंत्रज्ञानातून अन्नाला सशक्त करण्याच्या प्रयोगाबद्दल उदाहरणासह माहिती दिली. डॉ. राजीव मोहता यांनी भुकेची मानसिकता या विषयावर बोलताना वयोमानानुसार खाण्याच्या आवडीनिवडीत बदल होत असून मुले, आईवडिलांचे उद्बोधन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आभार डॉ. प्रकाश इटनकर यांनी मानले. यावेळी फार्मसी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. जास्मीन गेव्ह आवारी, समन्वयक डॉ. रेखा शर्मा, डॉ. सबिहा वली, मार्गदर्शक डॉ. ए. एन. राधा, परिषदेच्या आयोजक डॉ. कविता गुप्ता, डॉ. रेणुका माईंदे उपस्थित होत्या.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठmedicineऔषधं