शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका; रविश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:24 AM

नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका, तर त्यांचे आदर्श व विचारांवर जगा. आज आदर्शांसाठी परत एकदा संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ संपादक रविश कुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देस्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक लोक स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवतात, मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास नसतो. म्हणूनच समाजातील विविध दबाव व भयापोटी ते झुकतात. नावापुरते आंबेडकरवादी होऊ नका, तर त्यांचे आदर्श व विचारांवर जगा. आज आदर्शांसाठी परत एकदा संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ संपादक रविश कुमार यांनी व्यक्त केले. नागपुरात स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नागालँडचे पोलीस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, नवी दिल्ली येथील जीएसटीचे उपायुक्त प्रशांत रोकडे, कुसुमताई तामगाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. वृत्तवाहिन्यांवर विश्वास न ठेवता स्वत: अभ्यास केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांनी दर्शक नव्हे तर नागरिक व्हावे, असे रविश कुमार म्हणाले. आपल्या देशात खासगी शाळांचे अवास्तव स्तोम माजले आहे. यातूनच कमकुवत नागरिक निर्माण होत आहेत. शिक्षण देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. यासाठी नागरिकांनी जागृत व्हायला हवे. राजकारणात अगोदर बंदुकांच्या आधारावर दहशत निर्माण करण्यात यायची. आता शिवराळ भाषेचे बाहुबली दिसून येतात, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी राज्यातील गरीब कुटुंबातील ५० विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. अनिल बहादुरे यांनी प्रास्ताविक केले. तर सिद्धार्थ गायकवाड यांनी उपक्रमाची भूमिका मांडली.

पाच वर्षांपासून देशात अंधकारमय वातावरणमागील पाच वर्षांपासून देशात अंधकारमय वातावरण आहे. अनेक गोष्टी बोलत येत नाहीत व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका चौकटीत बंद झाल्या आहेत, असे म्हणत संदीप तामगाडगे यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र शासनावरच निशाणा साधला आहे. अनेकांना बोलण्याअगोदर विचार करावा लागत असल्याचे पाहतो आहे. मागील पाच वर्षांपासून अनेकांमध्ये एक प्रकारची घुसमट अनुभवयाला मिळते आहे. अनुसूचित जातीतील लोकांनी नोकरीमध्ये जाऊन स्वत:ला बांधून घेतले आहे. स्वत:च्या मनातील गोष्टीदेखील ते बोलू शकत नाही. या कार्यक्रमासाठी अनेक अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. मात्र त्यांनी भीतीपोटी येथे येणे टाळले असे तामगाडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Ravish Kumarरवीश कुमार