शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विभक्त बापाची टेलरकी चालेना, आता शिक्षक आईनेच उचलावा मुलांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 21:52 IST

Nagpur News एखाद्या बापाचा व्यवसायच चालत नसेल आणि आई कमावती असेल, तर आईनेच मुलांची पोषणाची जबाबदारी उचलावी, असा आदेश एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा खावटी प्रकरणात निर्णयअपत्यांनी आईमार्फत टाकलेली याचिका खारीज

नागपूर : विभक्त प्रकरणांमध्ये अपत्यांचे पालनपोषण करणे ही वडिलांची जबाबदारी आहे. मात्र एखाद्या बापाचा व्यवसायच कोरोना संक्रमणासारख्या आपत्तीत चालत नसेल आणि आई कमावती असेल, तर आईनेच मुलांची पोषणाची जबाबदारी उचलावी, असा मानवतावादी संदेश देणारा आदेश एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी दिला आहे. टेलर असलेल्या वडिलांना कोरोनाचा आर्थिक फटका बसल्यामुळे आता शिक्षक आईनेच तीन अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडावी, असा हा आदेश आहे.

या प्रकरणातील दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांना दोन लहान मुली व एक मुलगा आहे. अपत्यांचे पालन-पोषण करणे, ही वडिलांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. परंतु, या प्रकरणातील वडील व्यवसायाने टेलर असून, कोरोनामुळे त्यांच्या कामावर वाईट परिणाम झाला आहे. त्यांच्याकडे कामे येणे बंद झाले आहे. याशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचे अन्य स्रोत असल्याची माहिती रेकॉर्डवर नाही. दुसऱ्या बाजूने आई व्यवसायाने शिक्षिका असून, त्यांचे मासिक वेतन ७५ हजार रुपये आहे. ही बाब लक्षात घेता, त्या तीन अपत्यांचे पालनपोषण करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांनीच अपत्यांचा खर्च सोसावा, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले आहे. याशिवाय, भविष्यात वडिलांच्या आर्थिक उत्पन्नाची ठोस माहिती उपलब्ध झाल्यास पुन्हा अपत्यांसाठी खावटी मागण्याची मुभा आईला देण्यात आली.

सुरुवातीला मिळाली होती खावटी

सुरुवातीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन अपत्यांना मासिक एक हजार रुपये खावटी मंजूर केली होती. त्यामुळे वडिलांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला. परिणामी, अपत्यांनी खावटीसाठी आईमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका खारीज करण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय