शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

तंत्रज्ञानातून बदलली शेतीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:20 IST

मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकºयाने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली.

ठळक मुद्देआदासाच्या तरुण शेतकऱ्याचे पाऊलदहा एकरात घेतले ६५० टनावर मिरचीचे उत्पादन

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, शेती आता फायद्याचा सौदा राहिलेला नाही, अशा नकारात्मक गोष्टी आपण सातत्याने ऐकतो. परंतु नकारात्मता सोडून सकारात्मक विचाराने पाऊल टाकले आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड दिली तर शेतीही आयुष्याची दशा आणि दिशा बदलू शकते.मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकऱ्याने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली. या शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून दहा एकराच्या शेतीत मिरचीचे ६५० टनाच्या वर उत्पादन घेण्यात यश मिळविले.संजय आतीलकर यांचे वडील तसे सधन शेतकरी. त्यांच्याकडे १२ एकर शेती आहे. शिवाय इतरांकडूनही ठेक्याने घेत ते शेती करायचे. मात्र त्यांनी पारंपरिक शेतीशिवाय दुसरा पर्याय कधी निवडला नाही. संजय यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुलाने शेतीऐवजी नोकरी करावी, ही वडिलांची इच्छा होती. मात्र संजय यांनी केवळ वर्षभर नोकरी करून मोर्चा शेतीकडेच वळविला. वडील नाराज झाले. पण संजय यांनी विचार बदलला नाही. सुरुवातीचे तीन-चार वर्ष त्यांनीही पारंपरिक शेतीला प्राधान्य दिले. यात फार लाभ दिसत नव्हता.अशात कृषितज्ज्ञ राहुल फुसे यांचे मार्गदर्शन संजय यांना मिळाले. संजय यांनी जळगाव येथे ड्रीप सिंचनाच्या सुविधेची माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार एक प्रयोग म्हणून एक वर्ष केवळ एका एकरात ड्रीप सिंचनाच्या सोयीने मिरचीची लागवड केली. चांगले परिणाम दिसून आले. पुढल्या वर्षी तब्बल १० एकरात ड्रीप सिंचनाची सुविधा करून मिरचीची लागवड केली. साडेतीन एकरमध्ये पारंपरिक पद्धतीने मिरची लावली. हा प्रयोग यशस्वी ठरला. काही दिवसातच झाडे पाच फुटापर्यंत वाढली. पहिल्या व दुसऱ्या तोड्यात प्रमाण कमी होते, तिसऱ्या व चौथ्या तोड्यात उत्पादन प्रतिएकर ८ टनावर गेले. प्रत्येक तोड्यात ८० टनाप्रमाणे ६५० टनापेक्षा अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा ३० लाखांवर म्हणजेच दुप्पट होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.थेट दिल्लीला रवाना केला मालसंजय यांच्या प्रेरणेने इतर शेतकऱ्यांनीही मिरचीचे उत्पादन सुरू केले आहे. पण ते एवढ्यावर थांबले नाही. आपला माल दलालामार्फत विक्री करण्यापेक्षा स्वत:च का पाठवू नये, हा निर्धार त्यांनी केला व दिल्लीला माल पाठविण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी एकावेळी १६ ते १७ टन माल गरजेचा होता. संजय यांनी आसपासच्या शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले. त्यांचाही माल गोळा करून थेट दिल्लीच्या मार्केटमध्ये रवाना केला. याचवर्षी सुरू केलेला हा प्रयोगही यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपासून मार्चपर्यंत ही निर्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :agricultureशेती