शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानातून बदलली शेतीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:20 IST

मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकºयाने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली.

ठळक मुद्देआदासाच्या तरुण शेतकऱ्याचे पाऊलदहा एकरात घेतले ६५० टनावर मिरचीचे उत्पादन

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, शेती आता फायद्याचा सौदा राहिलेला नाही, अशा नकारात्मक गोष्टी आपण सातत्याने ऐकतो. परंतु नकारात्मता सोडून सकारात्मक विचाराने पाऊल टाकले आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड दिली तर शेतीही आयुष्याची दशा आणि दिशा बदलू शकते.मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकऱ्याने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली. या शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून दहा एकराच्या शेतीत मिरचीचे ६५० टनाच्या वर उत्पादन घेण्यात यश मिळविले.संजय आतीलकर यांचे वडील तसे सधन शेतकरी. त्यांच्याकडे १२ एकर शेती आहे. शिवाय इतरांकडूनही ठेक्याने घेत ते शेती करायचे. मात्र त्यांनी पारंपरिक शेतीशिवाय दुसरा पर्याय कधी निवडला नाही. संजय यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुलाने शेतीऐवजी नोकरी करावी, ही वडिलांची इच्छा होती. मात्र संजय यांनी केवळ वर्षभर नोकरी करून मोर्चा शेतीकडेच वळविला. वडील नाराज झाले. पण संजय यांनी विचार बदलला नाही. सुरुवातीचे तीन-चार वर्ष त्यांनीही पारंपरिक शेतीला प्राधान्य दिले. यात फार लाभ दिसत नव्हता.अशात कृषितज्ज्ञ राहुल फुसे यांचे मार्गदर्शन संजय यांना मिळाले. संजय यांनी जळगाव येथे ड्रीप सिंचनाच्या सुविधेची माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार एक प्रयोग म्हणून एक वर्ष केवळ एका एकरात ड्रीप सिंचनाच्या सोयीने मिरचीची लागवड केली. चांगले परिणाम दिसून आले. पुढल्या वर्षी तब्बल १० एकरात ड्रीप सिंचनाची सुविधा करून मिरचीची लागवड केली. साडेतीन एकरमध्ये पारंपरिक पद्धतीने मिरची लावली. हा प्रयोग यशस्वी ठरला. काही दिवसातच झाडे पाच फुटापर्यंत वाढली. पहिल्या व दुसऱ्या तोड्यात प्रमाण कमी होते, तिसऱ्या व चौथ्या तोड्यात उत्पादन प्रतिएकर ८ टनावर गेले. प्रत्येक तोड्यात ८० टनाप्रमाणे ६५० टनापेक्षा अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा ३० लाखांवर म्हणजेच दुप्पट होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.थेट दिल्लीला रवाना केला मालसंजय यांच्या प्रेरणेने इतर शेतकऱ्यांनीही मिरचीचे उत्पादन सुरू केले आहे. पण ते एवढ्यावर थांबले नाही. आपला माल दलालामार्फत विक्री करण्यापेक्षा स्वत:च का पाठवू नये, हा निर्धार त्यांनी केला व दिल्लीला माल पाठविण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी एकावेळी १६ ते १७ टन माल गरजेचा होता. संजय यांनी आसपासच्या शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले. त्यांचाही माल गोळा करून थेट दिल्लीच्या मार्केटमध्ये रवाना केला. याचवर्षी सुरू केलेला हा प्रयोगही यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपासून मार्चपर्यंत ही निर्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :agricultureशेती