शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नागपुरातील नवीन कोरा महाराजबाग रोडही खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:30 IST

महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.

ठळक मुद्देमहामेट्रोने सुरू केले काम 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.अलीकडेच महामेट्रोने केबल टाकण्यासाठी महाराजबाग रोडवर खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपूर्वीच करण्यात आले आहे. तेव्हा ‘शहरातील विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका होत असतात. तेव्हा अशा गोष्टींवर चर्चा होत नाही का? ’असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठ महिन्यांच्या आतच नवीन रस्त्यांचे खोदकाम होत असेल तर त्यावर झालेला खर्च वाया जाणार नाही का? हा खर्च वाचवता आला असता.फूटपाथवरील टाईल्सही काढल्याविद्यापीठ चौक ते महाराजबागमार्गे विद्यापीठ ग्रंथालय चौकापर्यंतचा रस्ता नुकताच बांधण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथही बनवण्यात आले. परंतु महामेट्रोने येथे केबल टाकण्याचे काम सुरू केल्यानंतर सर्वप्रथम येथील फूटपाथवरील टाईल्स काढल्या. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शहरात रिलायन्सने केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते. फूटपाथही तोडले होते. तेव्हा कंपनी स्वत: फूटपाथची दुरुस्ती करून देईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु तसे झाले नाही. विशेष म्हणजे मनपा प्रशासनानेही ते काम पूर्ण करणे योग्य समजले नाही किंवा संबंधिताविरुद्ध दंड ठोठावून कुठली कारवाईसुद्धा केली नाही.समन्वयाचा अभाव का?शहरात मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. परंतु मागील काही वर्षात मेट्रोचे इतर शासकीय विभागांशी समन्वय दिसून येत नाही. शहरात वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी मेट्रोने स्वत:चे कर्मचारी तैनात केले आहे. परंतु त्यांना वाहतूक विभागाची पाहिजे तशी मदत मिळत नाही. तसेच महापालिका क्षेत्रातही काम सुरू आहे. परंतु मनपासोबत त्यांचा ताळमेळ वेळोवेळी जुळत नसल्याचे दिसून येते. ज्या रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपूर्वी शासकीय खर्चातून करण्यात आले. तोच रस्ता आता केवळ केबल टाकण्याच्या नावावर खराब केला जात आहे. हे ताजे उदाहरण दोन विभागातील समन्वयाचा अभाव दर्शविणारे आहे. महामेट्रोच्या केबल टाकून झाल्यावरही रस्त्याचे काम केले जाऊ शकले असते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर