शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरातील नवीन कोरा महाराजबाग रोडही खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:30 IST

महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.

ठळक मुद्देमहामेट्रोने सुरू केले काम 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे.अलीकडेच महामेट्रोने केबल टाकण्यासाठी महाराजबाग रोडवर खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपूर्वीच करण्यात आले आहे. तेव्हा ‘शहरातील विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका होत असतात. तेव्हा अशा गोष्टींवर चर्चा होत नाही का? ’असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठ महिन्यांच्या आतच नवीन रस्त्यांचे खोदकाम होत असेल तर त्यावर झालेला खर्च वाया जाणार नाही का? हा खर्च वाचवता आला असता.फूटपाथवरील टाईल्सही काढल्याविद्यापीठ चौक ते महाराजबागमार्गे विद्यापीठ ग्रंथालय चौकापर्यंतचा रस्ता नुकताच बांधण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथही बनवण्यात आले. परंतु महामेट्रोने येथे केबल टाकण्याचे काम सुरू केल्यानंतर सर्वप्रथम येथील फूटपाथवरील टाईल्स काढल्या. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शहरात रिलायन्सने केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते. फूटपाथही तोडले होते. तेव्हा कंपनी स्वत: फूटपाथची दुरुस्ती करून देईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु तसे झाले नाही. विशेष म्हणजे मनपा प्रशासनानेही ते काम पूर्ण करणे योग्य समजले नाही किंवा संबंधिताविरुद्ध दंड ठोठावून कुठली कारवाईसुद्धा केली नाही.समन्वयाचा अभाव का?शहरात मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. परंतु मागील काही वर्षात मेट्रोचे इतर शासकीय विभागांशी समन्वय दिसून येत नाही. शहरात वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी मेट्रोने स्वत:चे कर्मचारी तैनात केले आहे. परंतु त्यांना वाहतूक विभागाची पाहिजे तशी मदत मिळत नाही. तसेच महापालिका क्षेत्रातही काम सुरू आहे. परंतु मनपासोबत त्यांचा ताळमेळ वेळोवेळी जुळत नसल्याचे दिसून येते. ज्या रस्त्याचे काम सात ते आठ महिन्यांपूर्वी शासकीय खर्चातून करण्यात आले. तोच रस्ता आता केवळ केबल टाकण्याच्या नावावर खराब केला जात आहे. हे ताजे उदाहरण दोन विभागातील समन्वयाचा अभाव दर्शविणारे आहे. महामेट्रोच्या केबल टाकून झाल्यावरही रस्त्याचे काम केले जाऊ शकले असते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर