धुळेच्या ‘बीओई’ने ‘ते’ १२ लाख परत केले

By Admin | Updated: June 12, 2014 01:03 IST2014-06-12T01:03:23+5:302014-06-12T01:03:23+5:30

तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक आॅफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून

Dhule's 'BOE' has been refunding 12 lakhs | धुळेच्या ‘बीओई’ने ‘ते’ १२ लाख परत केले

धुळेच्या ‘बीओई’ने ‘ते’ १२ लाख परत केले

बनावट धनादेश प्रकरण : उच्च स्तरावर चौकशी
सेलू : तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक आॅफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून नरेश सी. चैनानी या नावाने ११ लाख ९० हजार ७६० रुपयांची परस्पर उचल केल्या गेली. या प्रकरणाने संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धुळे येथील बँक आॅफ इंडियाने ही रक्कम सेलू तहसील कार्यालयाला परत केली आहे.
तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांच्या फिर्यादीवरुन सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. धुळे बँकेच्या पत्रात सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र ही अफरातफर सिद्ध होत नसल्याची पुष्टी जोडत चौकशीत ही अफरातफर सिद्ध न झाल्यास सदर रक्कम बँकेला परत करण्याची तसदी घेण्याची बाब नमूद करण्यात आली आहे. एकंदर बँकेच्या या पत्रानुसार रकमेची अफरातफर झालेली नाही, तर बँकेने ही रक्कम परत कशी काय केली,

असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. यावरुन बँकेच्या या नव्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
बँक म्हणते,अफरातफर नाहीसदर प्रकरणात तहसीलच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे काढण्यात आलेली रक्कम धुळे येथील बँक आॅफ इंडियाने सेलू तहसील कार्यालयाच्या खात्यात जमा केली आहे. मात्र बँकेने चौकशीत अफरातफर झाली नसल्याचे नमूद केल्यामुळे मग ती रक्कम नेमकी कुठे गेली, असा सवालही उपस्थित होत आहे. बँकेकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची बाबही बँकेच्या वरिष्ठ शाखा व्यवस्थापकांनी तहसीलला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Dhule's 'BOE' has been refunding 12 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.