शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार देणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 9:53 PM

मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्देबिस्किट कारखान्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान आणि बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पुढील पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात स्थानिक आणि विदर्भातील युवकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.देशात बिस्किट आणि बेकरी उत्पादनात आघाडीच्या साज फूड प्रा.लि.च्या बिस्किट आणि बेकरी उत्पादने ब्रिस्क फार्मच्या देशातील बुटीबोरी येथील पाचव्या आणि पश्चिम भारतातील पहिल्या कारखान्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आयुक्त अनुपकुमार आणि बुटीबोरीच्या सरपंच अनिता ठाकरे उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, भारतात बिस्किटांची जास्त मागणी आहे. येथील लोक बिस्किट खाणे आणि खाऊ घालणे पसंत करतात. पूर्व भारताप्रमाणेच पश्चिम आणि मध्य भारतात कंपनीचा विकास व विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनी विस्तार करण्यास इच्छुक असेल तर सरकार सर्वतोपरी मदत करेल. स्थानिक एक हजार युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी कंपनीचे आभार मानले.छत्तीसगडपेक्षा एमआयडीसीत वीज स्वस्तमुख्यमंत्री म्हणाले, छत्तीसगडच्या तुलनेत एमआयडीसीमध्ये व्यावसायिक विजेचे दर कमी आहेत. त्याचा कंपनीला फायदा होईल. कंपनी लवकरच विस्तार करेल, अशी अपेक्षा आहे.कंपनीचे चेअरमन के.डी.पॉल यांनी कंपनीच्या विस्तार योजनांची माहिती दिली. स्वागतपर भाषण कंपनीचे महाव्यवस्थापक मयंक चक्रवर्ती यांनी केले. यावेळी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर