शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार

By योगेश पांडे | Updated: April 4, 2023 17:03 IST

जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकणार - फडणवीस

नागपूर : शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजिनाम्याची मागणी करताच राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरून फडणवीसदेखील आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अडीच वर्षांच्या काळात ज्यांनी घरी बसून काम केले त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असे नाही. जर आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. फडणवीस मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दोन दोन मंत्री तुरुंगात गेल्यावरदेखील त्यांचा राजिनामा घेण्याची हिंमत ज्यांनी दाखविली नाही, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. ज्यांच्या काळात पोलीस खंडणीबाज झाले त्यांना बोलण्याचा अधिकारच काय असा सवाल फडणवीस यांनी केला.मी राज्याचा गृहमंत्री असल्याने अनेक लोकांना अडचण होत असून ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मला गृहमंत्रीपद कसे सोडावे लागेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मी कुठल्याही स्थितीत हे पद सोडणार नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असून जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी आमचे सरकार करेल. पण त्याचे राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. कुणी चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी नागपुरकर, ठाकरेंहून खालची भाषा येते

त्यांचा जो थयथयाट आहे त्याला उत्तर देण्याचे कारणच नाही. पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून ते निवडून आले व त्यानंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा केला. खरा फडतूस कोण हे सर्वांनाच माहिती आहे. मी नागपुरचा आहे. ते ज्या भाषेत बोलले त्याहून खालची भाषा मला येते. पण मी तसा बोलणार नाही. तशी बोलण्याची माझी पद्धत नाही. याचे उत्तर त्यांना जनताच देईल, असेदेखील फडणवीस म्हणाले. चाणक्य म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातील चोर, डाकू, लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावे की राजाने योग्य काम सुरू केले आहे. मी राजा नाही, पण तरीदेखील चाणक्य जे म्हणाले ते राज्यात आता खरे होत असल्याचे दिसून येत आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे