शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

विकास मंडळं अधांतरी, कर्मचाऱ्यांना मात्र एक्स्टेंशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:00 IST

एप्रिल २०२० ला संपला कार्यकाळ : पुनर्गठनाची शिफारस निर्णयार्थ

कमल शर्मा

नागपूर : विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या राज्यातील तिन्ही वैधानिक विकास मंडळांचा कार्यकाळ दि. ३० एप्रिल २०२० रोजी संपला. मंडळांचे पुनर्गठन करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे निर्णयार्थ आहे. परंतु यासंदर्भात कुणीच काही ठोस सांगायला तयार नाहीत. दरम्यान, या तिन्ही मंडळांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांचे एक्स्टेंशन (मुदतवाढ) देण्यात आले आहे.

राज्याचा प्रादेशिक विकास संतुलितपणे व्हावा, हे निश्चित करण्यासाठी १ मे १९९४ रोजी संविधानाच्या कलम ३७१ (२) अंंतर्गत या विकास मंडळांचे गठन करण्यात आले होते. १९९९ मध्ये याचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवण्यात आला होता. २००४ मध्ये एक वर्षासाठी आणि नंतर २००५, २०१० आणि २०१५ मध्ये पाच-पाच वर्षांसाठी कार्यकाळ वाढवण्यात आला. २०१५ मध्ये यातून वैधानिक शब्द हटविण्यात आले. परंतु मंडळ कायम राहिले.

२०२० मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या मंडळाच्या कार्यकाळ विस्ताराची शिफारस केली नाही. २०२१ मध्ये जाता-जाता चूक सुधारली. नंतर शिंदे-फडणवीस सरकारने कार्यकाळ विस्ताराची शिफारस केली. वैधानिक शब्दही पुन्हा बहाल करण्याची घोषणा केली. परंतु मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंडळांबाबत कुठलेही ठोस संकेत मिळालेले नाही. दरम्यान, मंडळात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहा-सहा महिन्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मंडळातील एकूण ५७ पदांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या कुठलेही काम नसल्याने हे कर्मचारी त्रासले आहेत.

विदर्भात आठजणांचा स्टाफ

तिनही मंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे १७-१७ पदे मंजूर आहेत. विदर्भ विकास मंडळाचाच विचार केला तर येथे केवळ आठ पदांवरच नियुक्ती झाली आहे. सदस्य सचिवसारखे पद अजूनही रिक्त आहे. दोनवेळा नियुक्तीचा प्रयत्नही अपयशी ठरला.

विदर्भासाठी आवश्यक

  • अमरावती विभागात अजूनही सिंचनाचा १,०३,१३२ हेक्टरचे अनुशेष. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्हे प्रभावित.
  • १९९४च्या सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी १०० सिंचन प्रकल्पांपैकी केवळ ६७ भौतिकदृष्ट्या पूर्ण आहेत. ३३चे काम सुरू आहे.
  • १९९४ ते २०२२पर्यंत नवीन अनुशेष तयार झाला आहे. तो मोजण्याची कुठलीही चर्चा नाही.
  • ३१४ सिंचन प्रकल्पासाठी पाइपलाइनने पाणी पोहोचविण्याचे ३५ प्रकल्प थंडबस्त्यात

 

‘मित्र’टीमही अपूर्ण

विकसित भारत@२०४७ अंतर्गत २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत घेऊन जाण्याच्या संकल्पना उद्दिष्टासाठी गठित ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्सिटट्यूशन फॉर ट्रान्सफार्मेशन)ची टीम सुद्धा मंडळामुळे अपूर्ण आहे. ‘मित्र’चे सहा तज्ज्ञ सदस्यांपैकी तीन वैधानिक विकास मंडळातील सदस्य असतील. आता मंडळच अस्तित्वात नसल्याने हे पद रिक्त आहे.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर