शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

"निष्ठेने काम करूनही गद्दारीचा शिक्का ! मग पक्षात राहायचे कशाला?" काँग्रेसच्या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:32 IST

Nagpur : प्रा. पुरके-देशमुख यांच्या एकाच दिवशी वेगळ्या सभा

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : मागील काही महिन्यांपासून कळंब तालुक्यात काँग्रेसच्या दोन गटांत चांगलेच शीतयुद्ध रंगले आहे. दोन्ही गटांनी मागील आठवड्यात एकाच दिवशी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काँग्रेसमधील प्रवीण देशमुख गटाने राष्ट्रवादीची कास धरण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दोन गटांतील शीतयुद्धाला पक्षांतरानंतर पूर्णविराम मिळणार आहे.

प्रा. वसंत पुरके यांनी शहरातील एका आश्रमशाळेवर त्यांच्या गटातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवीण देशमुख गटाने काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यामुळे या बैठकीत गद्दारीचा विषय चांगलाच गाजला. अपवाद वगळता बहुतांश कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम केले. असे असले तरी जबाबदार व्यक्तीने पक्षविरोधी काम केले का? त्याचा कोणाकडे पुरावा आहे का? पुरावा असेल तर तो सादर करावा. पुरावा नसेल तर वैयक्तिक हेवेदाव्यासाठी काँग्रेस पक्षाचे नुकसान करू नये, असे मत या बैठकीत प्रा. पुरके यांच्या समक्ष काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

विधानसभेतील पराभव हा नियोजनाचा अभाव व 'रसद' पुरवठा न झाल्याने ओढवलेला आहे. याला कार्यकर्ते नाही तर नेते जबाबदार आहेत, असेही मत मांडण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या कार्यशैलीवर काहींनी रोष व्यक्त केला. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही लावून धरली. प्रवीण देशमुख गट काँग्रेस पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे प्रा. पुरके हे आपल्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन काँग्रेसमधील मंडळींना पक्षांतरापासून थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. प्रवीण देशमुख यांनी कळंब येथे घेतलेल्या बैठकीत निष्ठेने काम करूनही गद्दारीचा शिक्का बसत असेल, तर काँग्रेसमध्ये राहायचे कशाला? असा सवाल केला. 

भाजप प्रवेशाची घोषणा करूनही मुहूर्त नाही

घाटंजीतील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने पत्रपरिषदेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जाहीर घोषणा केली. मात्र या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजूनही निघालेला नाही. त्या पदाधिकाऱ्याला गावपातळीपासून नागपूर, मुंबईपर्यंत येरझारा माराव्या लागत आहे. यामुळे पक्षप्रवेश जाहीररित्या होणार की मुंबईतच प्रवेश होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर वाढले आहे. 

बाजार समितीत आज महत्त्वपूर्ण बैठक

कळंब बाजार समितीमध्ये शनिवार, २० सप्टेंबर रोजी काँगेसमधील नाराज मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्येच काँग्रेस पक्ष सोडण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूरPoliticsराजकारण