शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताचा धोका तरी वाजतोय खासगी शाळांचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 10:25 IST

विद्यार्थी होताहेत घामाघूम : सरकारी शाळा ३० जूनपासून

नागपूर : उन्हाच्या काहिलीला वैदर्भीय त्रासले आहे. पारा अद्यापही ४२ अंशांवर आहे. असे असतानाही नागपूर जिल्ह्यात राज्य मंडळ वगळता इतर सीबीएसई बोर्डाच्या काही शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासून सुरू होणार आहेत.

सध्या ऊन आणि आर्द्रतेने नागरिक बेचैन झाले आहेत. पंख्यांसोबतच कुलरची हवाही आराम देत नाहीये, तर दुसरीकडे अनेक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सीबीएसईच्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी माध्यमिक वर्ग सुरू झाले आहेत. काही ठिकाणी सकाळी सातची पाळी, तर काही ठिकाणी सकाळी दहापासून शाळा सुरू करण्यात आली आहे.

२० एप्रिलला शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासून सुरू होतील, असे म्हटले होते. इतर मंडळांच्या शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू केले तरच त्याबाबतचा निर्णय शालेय स्तरावर घेता येईल. महत्त्वाचे प्रकल्प सुरू झाल्यानंतरच इतर मंडळांच्या शाळा सुरू करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे असले तरी शाळा नियमित सुरू झाल्याचे दिसून येते.

- शैक्षणिक सत्रात एकसूत्रता असावी

शाळा सुरू झाल्यावर अनेक पालकांनी विरोधही केला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. शाळांच्या खोल्यांमध्ये दोन-तीन पंखे आहेत. उष्ण हवेमुळे चक्कर येते. या स्थितीत आतापासून शाळा सुरू करण्याचे कोणतेही औचित्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. काही शाळा सुरू झाल्या असल्या तरी उपस्थिती सामान्य नाही. अनेक पालक सहलीसाठी बाहेरगावी गेले आहेत. या स्थितीत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार आहे. काही दिवस पावसासोबतच उष्माही कमी होणार आहे. मग शाळा सुरू व्हायला हव्या होत्या. बोर्ड जरी वेगवेगळे असले तरी विद्यार्थी मात्र एकच आहेत. शाळांच्या शैक्षणिक सत्रात एकसूत्रता असावी. जेणेकरून विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकेल.

- सीबीएसईच्या ९० टक्के शाळा २६ जूनपासून

सीबीएसईच्या ९० टक्के शाळा या २६ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाची रीतसर परवानगी घेण्यात येणार आहे.

इतर मंडळांच्या शाळा केवळ महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांसाठीच सुरू करू शकतात. त्यानुसार काहीजणांनी शाळा सुरू केल्या असल्या तरी ३० पर्यंत शाळा सुरू करू, असे अनेकांनी सांगितले आहे. असे असले तरी राज्य बोर्डाच्या शाळा ३० तारखेलाच सुरू होतील.

- रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नागपूर.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाenvironmentपर्यावरणTemperatureतापमान