शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

उष्माघाताचा धोका तरी वाजतोय खासगी शाळांचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 10:25 IST

विद्यार्थी होताहेत घामाघूम : सरकारी शाळा ३० जूनपासून

नागपूर : उन्हाच्या काहिलीला वैदर्भीय त्रासले आहे. पारा अद्यापही ४२ अंशांवर आहे. असे असतानाही नागपूर जिल्ह्यात राज्य मंडळ वगळता इतर सीबीएसई बोर्डाच्या काही शाळा सुरू झाल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासून सुरू होणार आहेत.

सध्या ऊन आणि आर्द्रतेने नागरिक बेचैन झाले आहेत. पंख्यांसोबतच कुलरची हवाही आराम देत नाहीये, तर दुसरीकडे अनेक शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सीबीएसईच्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी माध्यमिक वर्ग सुरू झाले आहेत. काही ठिकाणी सकाळी सातची पाळी, तर काही ठिकाणी सकाळी दहापासून शाळा सुरू करण्यात आली आहे.

२० एप्रिलला शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासून सुरू होतील, असे म्हटले होते. इतर मंडळांच्या शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू केले तरच त्याबाबतचा निर्णय शालेय स्तरावर घेता येईल. महत्त्वाचे प्रकल्प सुरू झाल्यानंतरच इतर मंडळांच्या शाळा सुरू करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे असले तरी शाळा नियमित सुरू झाल्याचे दिसून येते.

- शैक्षणिक सत्रात एकसूत्रता असावी

शाळा सुरू झाल्यावर अनेक पालकांनी विरोधही केला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. शाळांच्या खोल्यांमध्ये दोन-तीन पंखे आहेत. उष्ण हवेमुळे चक्कर येते. या स्थितीत आतापासून शाळा सुरू करण्याचे कोणतेही औचित्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. काही शाळा सुरू झाल्या असल्या तरी उपस्थिती सामान्य नाही. अनेक पालक सहलीसाठी बाहेरगावी गेले आहेत. या स्थितीत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होणार आहे. काही दिवस पावसासोबतच उष्माही कमी होणार आहे. मग शाळा सुरू व्हायला हव्या होत्या. बोर्ड जरी वेगवेगळे असले तरी विद्यार्थी मात्र एकच आहेत. शाळांच्या शैक्षणिक सत्रात एकसूत्रता असावी. जेणेकरून विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळू शकेल.

- सीबीएसईच्या ९० टक्के शाळा २६ जूनपासून

सीबीएसईच्या ९० टक्के शाळा या २६ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाची रीतसर परवानगी घेण्यात येणार आहे.

इतर मंडळांच्या शाळा केवळ महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांसाठीच सुरू करू शकतात. त्यानुसार काहीजणांनी शाळा सुरू केल्या असल्या तरी ३० पर्यंत शाळा सुरू करू, असे अनेकांनी सांगितले आहे. असे असले तरी राज्य बोर्डाच्या शाळा ३० तारखेलाच सुरू होतील.

- रवींद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नागपूर.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाenvironmentपर्यावरणTemperatureतापमान