शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

रोहयोच्या कामापासून वंचित

By admin | Updated: May 5, 2014 00:33 IST

पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द येथे शेतकºयांचे खरीप हंगामाचे काम होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला.

देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द येथे शेतकºयांचे खरीप हंगामाचे काम होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र शेतकरी व शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे न मिळाल्याने या परिसरात रोजगार हमी योजना पांढरा हत्ता ठरली आहे. शेतीचा खरीप हंगाम संपला की, स्थानिक शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय ग्रामीण परिसरात रोजगारासंदर्भात अन्य कुठेही काम मिळत नसल्याने अनेक लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होतात. हे लोक उन्हाळ्यातील संपूर्ण दिवस बाहेरगावी काढत असत. ग्रामीण परिसरातील शेतमजुरांवर होणारे हे नेहमीचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यान्वित केली. सदर योजनेचा उद्देश जरी चांगला असला तरी यावर नियंत्रण असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिन व अकार्यक्षम धोरणामुळे ही योजना या ठिकाणी सध्यस्थितीत दुर्लक्षीत झालेली आहे. देवाडा खुर्द येथील लोकसंख्या चार हजारांच्या घरात असून या ठिकाणी अनेक बेरोजगार तरुण हाताला काम मिळत नसल्याने वेठबिगारासारखे रिकामे फिरत असतात. या ग्रामपंचायतीअंतर्गत ९०० पेक्षा अधिक मजुरांच्या नावाने जॉबकार्ड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक कामे मंजुर असून मजुर क्षमतासुद्धा काम करण्यास सक्षम असताना रोजगार हमी योजनेच्या कामाला पाहिजे त्या प्रमाणात सुरूवात केली जात नसल्याने स्थानिक मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. जुलै महिन्यात पावसाने कहर केल्याने नदी-नाल्याच्या काठावरील शेतकºयांच्या जमिनीचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकणी नाल्याची पाळ फुटल्याने नाल्यातील पाणी थेट शेतकºयांच्या शेतांमध्ये शिरल्याने शेताला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. त्यांना दुबार पीक घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी ग्रामपंचायतीअंतर्गत आयोजित ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत ‘नाला सरळीकरण’ योजनेच्या माध्यमातून सदरकाम मंजुर करून घेतले आहे. परंतु आजतागायत दोन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा नाला सरळीकरणाच्या कामाला ग्रामपंचायत प्रशासनाने सुरूवात केली नसल्याने पुढील खरीप हंगाम कसा साधायचा, या विवंचनेत स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणची रोजगार हमी योजना तुर्तास पांढरा हत्ती ठरली आहे. स्थानिक ठिकाणी बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळत नसल्याने ते इतरत्र भटकत आहेत. दुसरीकडे ग्रामपंचायतस्तरावर कामे मंजुर असताना सुद्धा रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरूवात केली जात नसल्याने मजुरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाले असून दुसरीकडे मात्र बेरोजगारांची फौज वाढत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला सरळीकरणाचे काम केल्यास फुटलेल्या पाळीतून येणारा पाण्याचा प्रवाह बंद होवून नुकसानग्रस्त शेतकºयांना पुढील उत्पादन घेणे शक्य होवून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी येणार नाही आणि बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)