शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:57 IST

Nagpur : अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे 'वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प' योजनेअंतर्गत वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द जलाशयातून पाणी उचलून बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणापर्यंत एकूण ४२६ कि.मी. लांबीचा कालवा असणार आहे. या प्रकल्पात विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिद्ध असलेल्या वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

या विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांतील एकूण ३ लाख ७१ हजार २७७ हे. क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या भागातील भूजल पातळी ही ८०० फुटापेक्षा खाली गेल्यामुळे या क्षेत्रास डार्क झोन संबोधिल्या जाते. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात येत होती. पाण्याअभावी संत्रा व मोसंबी बागा वाळत असून लागवडीचे क्षेत्रफळसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेत विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिद्ध असलेल्या आणि सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असताना काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे या भागाचा "वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प" मध्ये समावेश करावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख