शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

व्हीएनआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी तपासाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:11 AM

व्हीएनआयटीतील विद्यार्थी मनोज कुमार गणप्पुरमने आत्महत्या केल्यावर कुटुंबीयांना विश्वास होत नसून त्यांनी यात गडबड असल्याची शंका उपस्थित करून तपासाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमुलाच्या आत्महत्येवर कुटुंबीयांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीतील विद्यार्थी मनोज कुमार गणप्पुरमने आत्महत्या केल्यावर कुटुंबीयांना विश्वास होत नसून त्यांनी यात गडबड असल्याची शंका उपस्थित करून तपासाची मागणी केली आहे.बुधवारी सायंकाळी आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळाली होती. मनोज कुमार बीटेक मायनिंगमध्ये पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सायंकाळी वसतिगृहाचा दरवाजा तोडल्यानंतर तो खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. शिक्षकांनी तो नापास झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, अशी शंका उपस्थित केली होती. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला आहे. मनोज कुमारचे कुटुंबीय घटनेची माहिती मिळताच आज पहाटेच नागपूरला पोहोचले. त्यांच्या कुटुंबात आईवडिल, दोन बहिणी आहेत. वडिलांना पाच भाऊ आहेत. सर्वांचे संबंध चांगले आहेत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी मनोज आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात आला होता. त्यावेळी त्याची बहिणींसोबत नापास झाल्याची चर्चाही झाली होती. त्याने सर्व पेपर सहज देणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसानंतर त्याने दुसऱ्या बहिणीच्या लग्नात येणार असल्याचे सांगितले होते. १६ जुलैला परीक्षा आटोपली. तोपर्यंत मनोज सामान्य होता. त्याने ऑनलाईन जेवण बोलावले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार बुधवारी चुलत बहिणीचा वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी मनोजचा फोन न आल्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी संपर्क केल्यानंतर काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने कुटुंबीयांनी वसतिगृहाच्या वॉर्डनसोबत संपर्क केला. त्यानंतर घटनेची माहिती मिळाली. कुटुंबीयांच्या मते त्यांना मनोजच्या आत्महत्येवर विश्वास नाही. त्याच्या खोलीत सुसाईड नोटही मिळाली नाही. मनोजचा मोबाईलही संशयास्पदरीत्या गायब आहे. पोलीसही मोबाईलची काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. व्हीएनआयटी प्रशासनाने त्यांना वसतिगृह किंवा घटनास्थळही दाखविले नाही. त्यांना थेट शवविच्छेदनासाठी येण्यास सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी