शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

आरक्षण हटविण्याची भाषा करणाऱ्यांना हटवा-आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:18 IST

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी आदिवासींचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

नागपूर : सेव्ह मेरिटची भाषा करणारे लोक आरक्षणविरोधी असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या समीक्षेची भाषा केली जात आहे. हे सर्व प्रकार आरक्षण हटविण्याचे षड्यंत्र असून सत्ताधारी पक्षाचा याला पाठिंबा आहे, तेव्हा आरक्षण हटविण्याची भाषा करणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेतून हाकला, आणि स्वत:ची सत्ता संपादित करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी आदिवासींचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. हमराज उईके, दिनेश मडावी, प्रशांत बोडखे, नीरंजन मसराम, अ‍ॅड. स्वाती मसराम, मंगला उके, राजेंद्र मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आदिवासींची जीवनपद्धती, संस्कृती वेगळी आहे. तरीही त्यांच्या संस्कृ तीवर आक्रमण केले जात आहे. आजपर्यंत दोन समाजाला आपसात लढवून आपली सत्ता शाबूत ठेवण्याचेच प्रयत्न झाले. परंतु आता आम्ही झुंजणार नाही तर आपली सत्ता मिळवू. काही कुटुंबांनी जसे राजकारण ताब्यात घेतले आहे, तसेच काही कुटुंबांनी आदिवासींच्या जागांवरही ताबा मिळवला आहे. ही राजकीय कुटुंबशाही तोडायला आम्ही निघालो असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.सरकार असंवेदनशीलसांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांकडे सुरुवातीला सरकारने लक्षच दिले नाही. स्थानिक लोकांनी मदत केली नसती तर किमान लाखावर लोकांचा बळी गेला असता. कुही आणि वैनगंगेलाही पूर आला परंतु सरकारने ते उघडकीसही येऊ दिले नाही. हे सरकार असंवेदनशील व उदासीन आहे. काँग्रेसवर आम्ही टीका करतो, परंतु त्यांच्या काळात माणुसकी शिल्लक होती. या सरकारमध्ये ती संपली आहे, अशी टीकाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर