शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

आरक्षण हटविण्याची भाषा करणाऱ्यांना हटवा-आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:18 IST

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी आदिवासींचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

नागपूर : सेव्ह मेरिटची भाषा करणारे लोक आरक्षणविरोधी असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या समीक्षेची भाषा केली जात आहे. हे सर्व प्रकार आरक्षण हटविण्याचे षड्यंत्र असून सत्ताधारी पक्षाचा याला पाठिंबा आहे, तेव्हा आरक्षण हटविण्याची भाषा करणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सत्तेतून हाकला, आणि स्वत:ची सत्ता संपादित करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी आदिवासींचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. हमराज उईके, दिनेश मडावी, प्रशांत बोडखे, नीरंजन मसराम, अ‍ॅड. स्वाती मसराम, मंगला उके, राजेंद्र मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आदिवासींची जीवनपद्धती, संस्कृती वेगळी आहे. तरीही त्यांच्या संस्कृ तीवर आक्रमण केले जात आहे. आजपर्यंत दोन समाजाला आपसात लढवून आपली सत्ता शाबूत ठेवण्याचेच प्रयत्न झाले. परंतु आता आम्ही झुंजणार नाही तर आपली सत्ता मिळवू. काही कुटुंबांनी जसे राजकारण ताब्यात घेतले आहे, तसेच काही कुटुंबांनी आदिवासींच्या जागांवरही ताबा मिळवला आहे. ही राजकीय कुटुंबशाही तोडायला आम्ही निघालो असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.सरकार असंवेदनशीलसांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांकडे सुरुवातीला सरकारने लक्षच दिले नाही. स्थानिक लोकांनी मदत केली नसती तर किमान लाखावर लोकांचा बळी गेला असता. कुही आणि वैनगंगेलाही पूर आला परंतु सरकारने ते उघडकीसही येऊ दिले नाही. हे सरकार असंवेदनशील व उदासीन आहे. काँग्रेसवर आम्ही टीका करतो, परंतु त्यांच्या काळात माणुसकी शिल्लक होती. या सरकारमध्ये ती संपली आहे, अशी टीकाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर