शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीला विलंब - २७ लाखांचा फटका

By admin | Updated: July 16, 2014 01:14 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा)काम करणाऱ्या मजुरांना वेळेत मजुरी देता न आल्याने शासनाच्या तिजोरीवर सरासरी २७ लाखांचा अतिरिक्त भार पडला.

मनरेगा: वेळेत मजुरी देण्याचे बंधननागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा)काम करणाऱ्या मजुरांना वेळेत मजुरी देता न आल्याने शासनाच्या तिजोरीवर सरासरी २७ लाखांचा अतिरिक्त भार पडला.मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन यांनी ही माहिती दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना विलंबाने मजुरी मिळत होती. त्यामुळे मजूर या कामावर जाण्यास टाळत होते. ही बाब टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक बदल करण्यात आले. तसेच मजुरी देण्यास विलंब झाल्यास मजुरीवर व्याज देण्याची तरतूद असणारा नियम शासनाने केला. या उपरही गत वर्षात (२०१३-१४) मजुरांना मजुरी देताना विलंब झाल्याने राज्यात सरासरी २७ लाख ५४ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागले. विशिष्ट काळापर्यंत विलंब झाल्यास त्याची जबाबदारी ही शासनाची असते. पण त्यानंतर प्रत्येक पातळीवर याबाबत जबाबदारी ठरवून देण्यात आली असून त्या त्या टप्प्यावर जो अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल त्याच्याकडून विलंबाची रक्कम वसूल केली जाते, असे संकरनारायणन यांनी स्पष्ट केले.मनरेगाच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी तीन पातळीवर त्याचे अंकेक्षण करण्यात येते. त्यात समाजिक अंकेक्षणाचाही समावेश असतो. २०१२-१३ या वर्षात करण्यात आलेल्या अंकेक्षणातून राज्यभरातील एकूण कामांपैकी ७० ते ८० टक्के कामे समाधानकारक असल्याचे दिसून आले. कामात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी ‘ई-मस्टर’, ‘ई-निधी व्यवस्थापन’ आणि ‘गुणवत्ता निरीक्षकांच्या मार्फत कामांची तपासणी’ आदी उपक्रम राबविण्यात आल्याने गैरव्यवहाराला आळा बसला.राज्यात २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५१७.१४ लाख मनुष्यदिन कामाची निर्मिती झाली असून त्यावर १२७८९३.६६ लाख रुपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात आतापर्यंत २१६.५३ लाख मनुष्यदिन कामाची निर्मिती करण्यात आली असून त्यावर ४४४८२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्यात २७२६८ कामांवर २८२०४२ मजूर उपस्थित होते. कामाची मागणी केल्यास काम देण्याची तयारी आहे, असे संकरनारायणन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)