शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:00 IST

भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपून गेली आहेत. राज्यात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे. अशातच सरकारने केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा फसवी आहे. महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतरच दुष्काळ जाहीर करण्याची घोषणाही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.सरकार जोपर्यंत दुष्काळ जाहीर करीत नाही तोपर्यंत खरीपातील सोयाबीन व कापसाला मदत मिळू शकत नाही. तसेच संपूर्ण राज्यात विहिरीत पाणी कमी असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून, या पिकांनाही मदत होऊ शकणार नाही. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित सवलती द्याव्यात व आर्थिक मदत करावी; अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखdroughtदुष्काळ