शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कोळीवाडे पुनर्विकासाचा सहा महिन्यांत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:37 IST

मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नागपूर -  मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य किरण पावसकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.पाटील म्हणाले, मुंबई शहर व मुंबई उपनगरातील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकन करण्यासाठी अनुसरावी लागणारी कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने कोळीवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे व पात्र अतिक्रमणदारांचे पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांनी सादर केला आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाही करण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला अग्रेषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मल्होत्रा हाउस येथीलउपनिबंधक कार्यालय हलविणारमुंबईतील मल्होत्रा हाऊस येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची इमारत मोडकळीस आली आहे. शिवाय काही ठिकाणी पडझडही झाली आहे, दुर्घटना टाळण्यासाठी हे कार्यालय त्वरित पर्यायी जागेत हलविण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी ही लक्षवेधी मांडली होती.देशमुख म्हणाले, मल्होत्रा हाऊसला भेट देऊन इमारतीची पाहणी केली आहे. इमारत मालकाला दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे, पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे.रायगडचा प्रलंबित निधी मिळणाररायगड जिल्ह्याला गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेला खनिज विकास निधी उपलब्ध करण्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता.जिल्ह्याच्या महसुलाच्या प्रमाणात विकास निधी संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने रायगड जिल्ह्यातील विकास कामे रखडल्याचे तटकरे यांनी निदर्शनास आणले. खरवली, सुरव, मोरवा या रस्त्यासाठी मंजूर १८ लाख रुपयांचा निधी कधी उपलब्ध करणार असा सवाल त्यांनी केला. निधीसंदर्भात पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार