शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

कोळीवाडे पुनर्विकासाचा सहा महिन्यांत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:37 IST

मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नागपूर -  मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करणे आणि पुनर्विकासासंबंधी शासन सहा महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्र वारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य किरण पावसकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.पाटील म्हणाले, मुंबई शहर व मुंबई उपनगरातील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकन करण्यासाठी अनुसरावी लागणारी कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने कोळीवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल शासनास सादर केला आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे व पात्र अतिक्रमणदारांचे पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांनी सादर केला आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाही करण्याकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला अग्रेषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मल्होत्रा हाउस येथीलउपनिबंधक कार्यालय हलविणारमुंबईतील मल्होत्रा हाऊस येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची इमारत मोडकळीस आली आहे. शिवाय काही ठिकाणी पडझडही झाली आहे, दुर्घटना टाळण्यासाठी हे कार्यालय त्वरित पर्यायी जागेत हलविण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. सदस्य अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी ही लक्षवेधी मांडली होती.देशमुख म्हणाले, मल्होत्रा हाऊसला भेट देऊन इमारतीची पाहणी केली आहे. इमारत मालकाला दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे, पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे.रायगडचा प्रलंबित निधी मिळणाररायगड जिल्ह्याला गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेला खनिज विकास निधी उपलब्ध करण्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता.जिल्ह्याच्या महसुलाच्या प्रमाणात विकास निधी संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने रायगड जिल्ह्यातील विकास कामे रखडल्याचे तटकरे यांनी निदर्शनास आणले. खरवली, सुरव, मोरवा या रस्त्यासाठी मंजूर १८ लाख रुपयांचा निधी कधी उपलब्ध करणार असा सवाल त्यांनी केला. निधीसंदर्भात पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार