शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘त्या’ जमिनी परत करण्याबाबत महिनाभरात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वेकोलि’ने नागपूर जिल्ह्यात संपादित केलेल्या काही जमिनींवर अद्यापपर्यंत कोळसा खाण सुरू होऊ शकलेली नाही. अशा ठिकाणी कोळसा खाण कितपत फायदेशीर ठरेल यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘वेकोलि’चे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीवरंजन मिश्रा यांनी ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतली ‘वेकोलि’ची आढावा बैठक : काम सुरू न झालेल्या खाणींच्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वेकोलि’ने नागपूर जिल्ह्यात संपादित केलेल्या काही जमिनींवर अद्यापपर्यंत कोळसा खाण सुरू होऊ शकलेली नाही. अशा ठिकाणी कोळसा खाण कितपत फायदेशीर ठरेल यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘वेकोलि’चे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीवरंजन मिश्रा यांनी दिली. ‘वेकोलि’च्या मुख्यालयात मंगळवारी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीला माजी आमदार आशिष जयस्वाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह ‘वेकोलि’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सावनेर परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन कोळसा खाणीसाठ़ी संपादित केली. गेल्या ३-४ वर्षांपासून ही जमीन ‘वेकोलि’च्या ताब्यात आहे. पण खाण सुरु झाली नाही म्हणून या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही व जमीनही परत मिळाली नाही. बोरगाव, सोनपूर, आदासा या भागातील शेतकऱ्यांची जमीनही संपादित करण्यात आली आहे याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर राजीवरंजन मिश्रा यांनी सांगितले की, या जमिनी परत करण्याच्या दृष्टीने महिनाभरात कारवाई करण्यात येईल. महानिर्मितीला लागणारा कोळसा ‘वेकोलि’कडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. महानिर्मितीला कोळसा कमी पडणार नाही, अशी हमी मिश्रा यांनी दिली. ज्या ठिकाणी रेल्वेने कोळसा नेणे शक्य नाही त्या ठिकाणी रस्ते वाहतुकीतून कोळसा पुरवठा झाला पाहिजे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया त्वरित करण्याचे निर्देशही चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीला दिले. उमरेडजवळ हेवती येथील वीज प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सन २०१४-१५ च्या धोरणानुसार करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले‘वेकोलि’चे सांडपाणी सिंचनासाठी मिळणार‘वेकोलि’चे सांडपाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठ़ी देण्यासाठी येत्या २८ एप्रिलला विदर्भ सिंचन महामंडळ आणि ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्यांमध्ये सामंजस्य करार करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात येणार आहे.पिण्याचे पाणी बंद करु नकापिपळा, वलनी, सिलेवाडा या कोळसा खाणीजवळ राहणाऱ्या नागरिकांना ‘वेकोलि’तर्फे मिळणारे पाणी बंद करण्यात आले. शेतकऱ्यांना यापूर्वी शेतीसाठ़ी पाणी मिळत होते. तेही बंद करण्यात आले. यावर पिण्याचे पाणी बंद न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी ‘वेकोलि’ला दिले. शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय तीन दिवसात अभ्यास करून घेतला जाईल, अशी माहिती ‘वेकोलि’तर्फे या बैठकीत देण्यात आली.

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरFarmerशेतकरी