शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘अ‍ॅट्रॉसिटी’बाबतचा निर्णय पूर्वग्रह दूषित ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:15 IST

अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाबाबत न्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवलेली आहेत, ती लक्षात घेता न्यायालयाचा हा निर्णय पूर्वग्रहदूषित तर नाही ना? जातीय मानसिकतेतून तर हा निर्णय देण्यात आलेला नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. तेव्हा हा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांची चौकशी व्हावी, अशी मागणी संविधानाचे अभ्यासक प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी येथे केली.

ठळक मुद्देदेवीदास घोडेस्वार : ‘त्या’ न्यायाधीशांची व्हावी चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाबाबत न्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवलेली आहेत, ती लक्षात घेता न्यायालयाचा हा निर्णय पूर्वग्रहदूषित तर नाही ना? जातीय मानसिकतेतून तर हा निर्णय देण्यात आलेला नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. तेव्हा हा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांची चौकशी व्हावी, अशी मागणी संविधानाचे अभ्यासक प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी येथे केली.‘ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याची उपयोगिता संपणार का? या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई) नागपूरतर्फे शुक्रवारी सायंकाळी बानाईच्या डॉ. आंबेडकर सभागृह उर्वेला कॉलनी येथे परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बानाईचे अध्यक्ष डॉ. एस.के. तलवारे होते. तर अ‍ॅड. शैलेश नारनवरे, अ‍ॅड. नितीन मेश्राम, अ‍ॅड. स्मिता कांबळे प्रमुख वक्ते होते.प्रा. देवीदास घोडेस्वार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय कायम राहिला. त्यात पार्लमेंटने हस्तक्षेप करून नवीन कायदा तयार केला नाही, तर या कायद्याचे अस्तित्वच संपेल. कायदा केवळ कागदावरच शिल्लक राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.प्रास्ताविक मनोज रामटेके यांनी केले. शिल्पा गणवीर यांनी संचालन केले.बॉक्स..हे तर ‘ज्युडिशियल टेररिजम’अ‍ॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ज्युडिशियल टेररिजम होय. हे अधिक घातक आहे. या निर्णयामुळे लाखो, करोडो दलित, आदिवासींवर अन्याय झाला आहे. पुनर्विचार याचिका दाखल केली तरी फारसा फरक पडणार नाही. कारण न्यायालयात त्याच मानसिकतेचे व तेच न्यायाधीश आहेत. तेव्हा संसदेनेच पुढाकर घेऊन नवीन कायदा करावा. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.- आंबेडकरवाद्यांनी आतान्यायालयावरच मोर्चे काढावेअ‍ॅड. नितीन मेश्राम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे संविधानाशी फ्रॉड आहे. हा निर्णय जातीय मानसिकतेतून तर देण्यात आलेला आहे म्हणून निर्णय देणाºया न्यायाधीशांची नार्को टेस्ट करण्यात यावी. न्यायाधीश जातीयवादी आहेत, हे म्हणण्याचे अधिकार आम्हाला असावे, असे स्पष्ट करीत विधानसभा व संसदेवर खूप मोर्चे निघाले आता आंबेडकरवाद्यांनी न्यायालयावरच मोर्चे काढावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर