शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कर्जमाफीचा निर्णय होणार, पण योग्य वेळी : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 8:41 PM

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीचा जाहीर केलेला पुढचा टप्पा लवकर देण्याच्या दृष्टीने वित्तमंत्री जयंत पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.विरोधकांच्या कांगाव्याबद्दल ते म्हणाले, सरकार नवीन आहे. आता कुठे कामकाज हाती घेतले आहे. नवीन सरकारला कामकाज करण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, हे त्यांनी समजून घ्यावे. त्यांना आम्हीही त्यासाठी वेळ दिला होता. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे सभागृहात दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे.नागरिकत्व संशोधन विधेयक सादर झाल्यापासून देशातील वातावरण बदलले आहे. पाच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. अनेक मंचावरून आणि अनेक भागांतून या विरोधात मते मांडली जात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंदर्भात दिल्लीमध्ये भूमिका स्पष्ट केली. पक्षाचीही हीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मिळून ठरवतील, त्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी निर्णय घेतील. अधिवेशनानंतर खातेवाटपासंदर्भात स्पष्टता होईल.स्थानिक पातळीवर महाआघाडीलवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आहे. वर्षभरात त्याचा अनुभव कसा राहतो, त्यावरून स्थानिक पातळ्यांवर महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल दिसेल. मात्र स्थानिक कार्यर्त्यांचीही भूमिका यात महत्त्वाची असल्याने त्याचाही विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी