शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

नागपूर ग्रामीणमध्ये वाढताहेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 11:29 PM

Deaths rise in rural लोकमतने बुधवारच्या अंकात ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही दुजोरा दिला आहे. याला जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षासह सदस्यांनी ठेवला.

ठळक मुद्देआरोग्य अधिकाऱ्यांवर स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमतने बुधवारच्या अंकात ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही दुजोरा दिला आहे. याला जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जबाबदार असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्षासह सदस्यांनी ठेवला. हाताबाहेर चाललेल्या कोरोनाच्या परिस्थितीला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवीत संताप व्यक्त करण्यात आला. स्थायी समितीच्या बैठकीत स्वत: अध्यक्षांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हतबलता दाखवीत ग्रामीण भागातील अवस्था पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.

जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. ग्रामीण भागात टेस्टिंगचा अभाव आहे. लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद कमी आहे. रुग्ण गंभीर झाल्यास दर्जेदार उपचाराची सोय नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ग्रामीण भागात नाही. शहरात रुग्णाला भरतीसाठी आणल्यास बेड उपलब्ध नाही. त्यामुळे घरातच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णाचा घरात मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी शहरासारखी सोय नाही. अंत्यसंस्काराची यंत्रणाच नसल्याने अंत्ययात्रा निघत आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने पाठपुरावा तरी किती करावा, असा सवालही त्यांनी यावेळी केला. बुधवारी ही बैठक ऑनलाईन पार पडली. यात सदस्य दिनेश बंग, नाना कंभाले, संजय झाडे या सदस्यांनी वर्षभराचा भत्ता स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.

- बैठकीतील निर्णय

१) १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी व अबंधित निधी आरोग्यावर खर्च करण्याची परवानगी.

२) आशा वर्करला २००० रुपये अतिरिक्त मानधन व त्यांच्या विम्याचा कालावधी वाढवून देण्याचा सरकारला प्रस्ताव पाठविणार.

३) गावठी डॉक्टरांमुळे रुग्ण गंभीर होत असल्याने, त्यांच्यावर कारवाईचे निर्देश.

- ग्रामीण भागातील आरोग्यासाठी ५७ कोटीची मागणी.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र २०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोयीसुविधा असावी, यासाठी ५७ कोटी रुपयाच्या निधीची मागणी जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे.

- जिल्हाधिकाऱ्यांकडे १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा प्रस्ताव पाठविला असून, ५७ कोटींची मागणी केली आहे. ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व सदस्य एक असून, इतरही बाबी पडताळून बघितल्या जात आहेत.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू