शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गावात दररोज होतात मृत्यू : जिल्हा परिषदेने काय उपाययोजना केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 20:55 IST

Deaths occur daily in tribal villagesकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध दिल्याशिवाय आरोग्य विभागाने काय केले? याचे उत्तर जिल्हा परिषदेने द्यावे. संतप्त झालेल्या आदिवासी भागातील जि.प. सदस्य शांता कुमरे यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्दे काँग्रेसच्या सदस्यानेच मागितले सत्ताधाऱ्यांकडे उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आदिवासी भागात चांगलेच तांडव माजविले. गावागावात दररोज मृत्यू झाले. पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना पाच दिवसांची औषध दिल्याशिवाय आरोग्य विभागाने काय केले? याचे उत्तर जिल्हा परिषदेने द्यावे. संतप्त झालेल्या आदिवासी भागातील जि.प. सदस्य शांता कुमरे यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली. आदिवासी दुर्गम भागात कोरोना हाताळण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आभासी पद्धतीने सुरू झाली. कोरोनावर उपाययोजनेचा विषय सुरू असताना, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढणे सुरू होते. अशात सत्ताधारी सदस्य प्रकाश खापरे विरोधकांना चूप बसा, असे सांगून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत होते. ही ताणाताणी सुरू असतानाच, ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी संतप्त होऊ खापरेंना चांगलीच चपराक लावली. विरोधकांना बोलू द्या, त्यांचा आवाज दाबू नका, असे वक्तव्य करून सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी हा भाग आदिवासीबहुल आहे. कोलितमारा, ढवळापूर, सुवरधरा, चारगाव, सालई, अंबाझरी, पथराई, देवलापार, करवाई या गावांमध्ये कोरोनाने अनेकांचे जीव गेले आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी या गावातील लोकांना २५ किलोमीटर जावे लागते आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर गृहविलगीकरणाचा सल्ला आणि ५ दिवसांच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या हाच उपचार आरोग्य विभागाचा आहे. कोविड केअर सेंटर नाही. गृहविलगीकरणातील रुग्णांची नियमित तपासणी नाही. गंभीर झालेल्या रुग्णांवर उपचाराची अत्याधुनिक सोय नाही. आरोग्य केंद्रामध्ये मनुष्यबळ नाही. त्यामुळे दररोजचे मृत्यू आदिवासी लोकांनी अनुभवले आहे. आजही परिस्थिती बदलली नाही. आदिवासी भागाकडे लक्ष न दिल्यास तिसऱ्या लाटेत हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही.

 भुईनिंबाचा पाला खाऊन झाले बरे

आरोग्य यंत्रणाच कुचकामी ठरली. औषधोपचार नाही. रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका नाही. त्यामुळे आरोग्य विभागावर लोकांचा विश्वास उडाला आहे. आदिवासी भागात अनेक जण भुईनिंबाचा पाला खाऊन बरे झाल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरणापूर्वी करा कोरोनाची टेस्ट

५ एप्रिलपासून आदिवासी भागामध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. लस घेतल्यानंतर कोरोना होतो, अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आजही तशीच स्थिती आहे. प्रशासनाने आता लसीकरणापूर्वी कोरोनाचे टेस्ट करूनच लस द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही

मी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आले. मला केवळ ५ दिवसांच्या औषधी देऊन घरात राहण्याचा सल्ला दिला. नंतर कुणी तपासायला आले नाही. लोकप्रतिनिधीची अशी अवस्था असेल, तर जनतेचे काय हाल असतील, त्यामुळेच सभेत संतप्त होऊन आदिवासींची परिस्थिती प्रशासनापुढे मांडली.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू