शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:03 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.

ठळक मुद्देमृताच्या पत्नीचा आरोप : कामगार विमा रुग्णालयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.दीपक गणपतराव ब्राह्मणकर (३८) रा. यवतमाळ, हल्ली मु. बुटीबोरी असे कामगार रुग्णाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष केअरवेल सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायजर पदावर दीपक ब्राह्मणकर कामाला होते. त्यांना काही दिवसांपासून पोटाचा त्रास होता. २७ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांनी सोमवारीपेठ येथील कामगार विमा रुग्णालयात तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी हर्निया शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी १५ जानेवारी २०१८ ची तारीख दिली. सकाळी ९.३० वाजता ते रुग्णालयात आले. डॉक्टरांनी भरती करून घेतले. त्यांच्या सोबत पत्नी आशा ब्राह्मणकर होती. ब्राम्हणकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, पतीला भरती होऊन २४ तास झाले तरी उपचाराला सुरुवात झाली नव्हती. साधी सलाईनही लावली नव्हती. भरती झाले तेव्हा पती चांगलेच होते. नाश्ता, जेवण देऊ नका असे डॉक्टरांनी सांगून सकाळी त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार केले. दीपक यांच्यासह इतर चार रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले होते. दीपक यांचा पहिला क्रमांक होता. शस्त्रक्रियेसाठी नेण्यापूर्वी कुठलीही तपासणी करण्यात आली नव्हती. त्यांचे केसपेपरसुद्धा तयार केले नव्हते. त्यामुळे डॉक्टर व स्टाफला रुग्णाचे नाव काय आहे, याचीसुद्धा माहिती नव्हती. शस्त्रक्रियागृहात नेले तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी बधिरीकरणाचा डोज दिला. परंतु हा डोज जास्त झाला की काय १५-२० मिनिटांमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. डॉक्टर काही सांगायला तयार नव्हते. डॉक्टरांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली. परिचारिका, मला व ‘आरएमओ’ला रुग्णवाहिकेत बसवून १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास धंतोली येथील केअर हॉस्पिटलमध्ये पाठविले. या दरम्यान, पतीची हृदयगती बंद होती. आॅक्सिजन मास्क नाकाऐवजी तोंडात टाकले होते. रक्तसुद्धा निघत होते. केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तपासून एक-दीड तास उपचार केले. परंतु नंतर मृत घोषित केले. पतीचा मृत्यू विमा रुग्णालयातच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला. बेजबाबदार डॉक्टर व स्टाफची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर