शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

नागरिकांशी सौजन्याने वागा : पोलीस आयुक्त-सहआयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:58 PM

‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले.

ठळक मुद्देविनाकारण बळाचा वापर करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी विनाकारण बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ठाणेदारांना फटकारले. तसेच नागपूर पोलिसांची प्रतिमा लक्षात ठेवून व्यवहार करा, उपद्रव करणाऱ्यांशी कडक वागा परंतु विनाकारण बळाचा वापर करू नका, नागरिकांशी सौजन्याने वागा,असे निर्देशही दिले.विनाकारण लोक रस्त्यावर येत असल्याने पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या लोकांवर दंडुके चालवले. परंतु यात अनेक निरपराध लोकही बळी पडले. नागरिकांनी आपली नाराजीही व्यक्त केली. कुठलीही विचारणा न करता पोलीस दंडुके चालवित असल्याबद्दल आपला रोष व्यक्त केला. पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. आज बुधवारी गुन्हे मिटिंग दरम्यान पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त यांनी ठाणेदारांशी संवाद साधला. तेव्हा आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचे कुणी पालन करीत नसेल, उपद्रव करीत असेल तर त्याच्याशी कठोरपणे वागा परंतु सर्वसामान्य नागरिकांशी सभ्यतेनेच वागले पाहिजे. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी घरासमोर फिरत असलेल्या लोकांशी विनाकारण अभद्र व्यवहार करण्यात आला. असे होता कामा नये. सामान्य नागरिक घराबाहेर फिरताना दिसून आले तर त्यांना समजावून घरी पाठवा. कामाचा ताण आणि उपद्रव करणाऱ्या लोकांप्रति असलेला राग सामान्य नागरिकांवर काढणे योग्य नाही. नागपूर पोलिसांनी आपल्या कार्यातून नागरिकांमध्ये चांगली ‘इमेज’ तयार केली आहे. त्यामुळे नागरिक नेहमीच पोलिसांचे समर्थन करीत त्यांना साथ देतात. ही ओळख कायम ठेवणे पोलिसांची जबाबदारी आहे.सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी टेलिफोन एक्सचेंज चौकात विनाकारण फोटो काढण्यासाठी उठाबश्या करायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. वाठोडा आणि सीताबर्डीच्या ठाणेदारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलही फटकारले. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना आवश्यकता असलेल्या लोकांना पास उपलब्ध करण्यास टाळाटाळ न करण्याचे निर्देश दिले.ते म्हणाले, किराणा, धान्य, दूध, भाजीपाला आदी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांशिवाय गरजू व्यक्तींना पास द्यायला हवे. पास जारी करण्यात काही ठाणेदार नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाही आहेत. याच्या तक्रारीही पोलीस आयुक्तांकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अशा ठाणेदारांना तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीत मनपाच्या एनडीएस पथकाबाबतही नागरिकांमध्ये रोष असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लॉकडाऊन असूनही २३ मार्च रोजी सतरंजीपुरा झोनमध्ये एनडीएस पथक जागनाथ बुधवारी येथे अतिक्रमण कारवाई करीत होते. नागरिकांनी या पथकाचा घेराव करून अपमानित केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सूचना न देता कारवाई करण्यात आली होती. एनडीएस पथक पोलिसांसारखी वर्दी घालत असल्याने पोलिसांनी प्रतिमा मलिन होत असल्याचेही सांगण्यात आले.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस