शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

"आमूलाग्र बदल दिसतोय, पण..."; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली

DCM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार टीका केल्यानंतर राजकीय पक्ष पुन्हा एकत्र दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी उद्धव यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. या भेटीनंतर महाराष्ट्रातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंच्या या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया  दिली आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी नागपुरात पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघेही फडणवीस यांच्या दालनात भेटले. काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा देखील झाली. याच भेटीवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

"चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतं. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधीपक्ष आणि विरोधी पक्षाचे नेतेही भेटतात. हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, सत्ता आल्यावर तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे २०१९-२० मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करतात. लोकसभेच्या विजनानंतर ते एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचे वाटपही केलं होतं आणि म्हणाले तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाकू. पण आता त्यात आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटणे काही गैर नाही. पण याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्यादिवशी घरी थेट ही परंपरा आहे," अशी खोचक टिप्पणी शिंदेंनी केली आहे. 

"काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करू नये. निकालाविरोधात लागला म्हणून विरोधकांनी टीका करू नये. ईव्हीएमवर आरोप करणे बंद करावे. निकाल विरोधात लागला म्हणून त्यांना आता ईव्हीएम आठवले आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांना न्याय देण्यावर विरोधकांनी भर द्यावा," असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.

"विधिमंडळाचं सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. सभागृहाबाहेर नौटंकी करण्यासाठी नव्हे. तिथे पायऱ्यांवर बसून नौटंकी केली जाते. यातच त्यांना समाधान वाटतं. मात्र ते करण्याऐवजी त्यांनी सभागृहात येऊन लोकांचे प्रश्न मांडावे. आता हिवाळी अधिवेशन विदर्भात चालू आहे तर विरोधकांनी विदर्भाच्या लोकांसाठी भांडावं," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे