शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नागपूर विभागातील धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:52 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ ३५.१३ टक्के साठा :उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये १८ आॅगस्ट रोजी केवळ ३५.१३ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात आजच्या तारखेला (१८ आॅगस्ट) १२४८.५४ दलघमी (३५.१३ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २०७.१५ दलघमी म्हणजे २०.३७ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ४०.५२ टक्के, रामटेकमध्ये ३१.३६ टक्के, लोवर नांद वणा ७३.६३ टक्के, वडगाव ६०.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४८.२५ टक्के, सिरपूर ४२.६० टक्के, पुजारी टोला ८१.३२ टक्के, कालिसरार ८२.२१ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३२.१७ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा १०० टक्के, गडचिरोली जिल्ह्यातील दिना ८०.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.९३ टक्के, धाम ३३.७९ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २६.७४ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - ३२.६१ आणि बावनथडी १८.४२ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा- असोलामेंढा हाऊसफुल्लविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प आमि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता केवळ ३५ दलघमी तर असोलामेंढा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरणे भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २२.६७ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.आॅगस्टमध्ये केवळ ४४.९ मिमी पाऊसआॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३१ जुलैपर्यंत नागपुरात एकूण ८९९.२ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सरासरी २६७ मिमी इतका पाऊस होतो. ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात एकाच दिवशी २१५.४ मिमी पाऊस झाला. तो आॅगस्ट महिन्यात २४ तासात पडलेल्या पावसाचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :Damधरणnagpurनागपूर