शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
2
उणे 40% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
3
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
4
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
5
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
6
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
7
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
8
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
9
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
10
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
11
IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री
12
Makar Sankranti 2026: किंक्रांत म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हा दिवस खरंच अशुभ असतो का?
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचा ऐतिहासिक भडका, एका दिवसात चांदी १४,१४३ रुपयांनी महागली; Gold मध्येही तेजी, पाहा नवे दर
14
"ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
15
IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
16
पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले
17
'बिनविरोध' निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा; हायकोर्टाने मनसेची याचिका फेटाळली
18
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
19
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
20
जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:52 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ ३५.१३ टक्के साठा :उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये १८ आॅगस्ट रोजी केवळ ३५.१३ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात आजच्या तारखेला (१८ आॅगस्ट) १२४८.५४ दलघमी (३५.१३ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २०७.१५ दलघमी म्हणजे २०.३७ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ४०.५२ टक्के, रामटेकमध्ये ३१.३६ टक्के, लोवर नांद वणा ७३.६३ टक्के, वडगाव ६०.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४८.२५ टक्के, सिरपूर ४२.६० टक्के, पुजारी टोला ८१.३२ टक्के, कालिसरार ८२.२१ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३२.१७ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा १०० टक्के, गडचिरोली जिल्ह्यातील दिना ८०.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.९३ टक्के, धाम ३३.७९ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २६.७४ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - ३२.६१ आणि बावनथडी १८.४२ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा- असोलामेंढा हाऊसफुल्लविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प आमि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता केवळ ३५ दलघमी तर असोलामेंढा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरणे भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २२.६७ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.आॅगस्टमध्ये केवळ ४४.९ मिमी पाऊसआॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३१ जुलैपर्यंत नागपुरात एकूण ८९९.२ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सरासरी २६७ मिमी इतका पाऊस होतो. ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात एकाच दिवशी २१५.४ मिमी पाऊस झाला. तो आॅगस्ट महिन्यात २४ तासात पडलेल्या पावसाचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :Damधरणnagpurनागपूर