शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

नागपूर विभागातील धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:52 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ ३५.१३ टक्के साठा :उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये १८ आॅगस्ट रोजी केवळ ३५.१३ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात आजच्या तारखेला (१८ आॅगस्ट) १२४८.५४ दलघमी (३५.१३ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २०७.१५ दलघमी म्हणजे २०.३७ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ४०.५२ टक्के, रामटेकमध्ये ३१.३६ टक्के, लोवर नांद वणा ७३.६३ टक्के, वडगाव ६०.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४८.२५ टक्के, सिरपूर ४२.६० टक्के, पुजारी टोला ८१.३२ टक्के, कालिसरार ८२.२१ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३२.१७ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा १०० टक्के, गडचिरोली जिल्ह्यातील दिना ८०.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.९३ टक्के, धाम ३३.७९ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २६.७४ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - ३२.६१ आणि बावनथडी १८.४२ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा- असोलामेंढा हाऊसफुल्लविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प आमि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता केवळ ३५ दलघमी तर असोलामेंढा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरणे भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २२.६७ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.आॅगस्टमध्ये केवळ ४४.९ मिमी पाऊसआॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३१ जुलैपर्यंत नागपुरात एकूण ८९९.२ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सरासरी २६७ मिमी इतका पाऊस होतो. ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात एकाच दिवशी २१५.४ मिमी पाऊस झाला. तो आॅगस्ट महिन्यात २४ तासात पडलेल्या पावसाचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :Damधरणnagpurनागपूर