धरणे भरलीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST2021-09-15T04:11:16+5:302021-09-15T04:11:16+5:30
पाऊस पूर्ण झाला असला तरी विदर्भातील जलसाठे पूर्णपणे भरलेले नाहीत. ४३०२.४२ दलघमी क्षमता असलेल्या नागपूर विभागाच्या माेठ्या धरणात ३०३५.३२ ...

धरणे भरलीच नाहीत
पाऊस पूर्ण झाला असला तरी विदर्भातील जलसाठे पूर्णपणे भरलेले नाहीत. ४३०२.४२ दलघमी क्षमता असलेल्या नागपूर विभागाच्या माेठ्या धरणात ३०३५.३२ दलघमी म्हणजे केवळ ६३.४१ टक्के साठा झाला आहे. मागील वर्षी ८३.७७ टक्के हाेता. अमरावती विभागात माेठ्या प्रकल्पात २७७४.३८ दलघमी म्हणजे ९१.४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील मध्यम प्रकल्प ३३.४३ टक्के तर अमरावती विभागात ६४.८ टक्के भरले आहेत. लघु प्रकल्पात नागपूर २०.२३ टक्के तर अमरावती २५.७१ टक्के साठा झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील माेठे प्रकल्पही अपूर्णच आहेत.
प्रकल्प आजचा साठा टक्के मागील वर्षी टक्के
खिंडसी ४४.६८ ४३.३८ ५१.२९
वडगाव १३८.५२ ९०.३८ ९४.४७
ताेतलाडाेह ८२५.४४ ६६.४२ ९५.१
नांद ४५.४ ६८.४५ ७५.११
कामठी खैरी १०७.२८ ४८.०९ ९५.४८