शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

By admin | Updated: June 6, 2014 01:01 IST

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’

दिवसभर संभ्रम : रात्री मात्र दिलासा नागपूर : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच  कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’मध्ये दम कसा भरायचा, याचीच चिंता कार्यकर्त्यांंंंना दिवसभर  सतावत राहिली. रात्री उशीरा राजीनामा परत घेतल्याचे मॅसेजेस आले आणि दिवसभराच्या तापापासून त्यांना काहीसा दिलासा मिळाला. दमानिया यांना नागपुरात लोकसभा निवडणुकीत  ६९ हजारावर मते मिळाली. या बळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी  कार्यकर्त्यांंंंनी चालविली होती. ऐनवेळी राष्ट्रीय चेहरा असलेल्या दमानियांनी साथ सोडल्याचे मॅसेजेस आले आणि कार्यकर्त्यांंंंचे मनोबल खचले.   ‘आप’वर विश्‍वास विश्‍वास दाखविणारे मतदारही नाराज झाले. खासगी चर्चेत  ‘आप या आये किसलिए ? ’ असा सवाल ते दमानियांच्या संदर्भात  करू लागले. आपण मुंबईच्या रहिवासी असलो तरी नागपूरकरांच्या संपर्कात राहू असे सांगणार्‍या दमानिया यांनी लोकसभेचे मतदान झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी  नागपूर सोडले. सव्वा महिन्यांनी निकालाच्या आदल्या दिवशी त्या नागपुरात आल्या. निकाल पाहिला आणि मुंबईला परतल्या.  ना पराभवाची  कारणमीमांसा केली ना कार्यकर्त्यांंंंंच्या भावना जाणून घेतल्या. आता मध्येच राजीनामा देऊन त्या मोकळ्या झाल्या. एखादा नेता असे कसा काय करू  शकतो, अशीच चर्चा कार्यकर्ते व मतदारांमध्ये होती. दमानिया यांना नागपुरात ६९ हजारावर मते मिळाली. पश्‍चिम, दक्षिण- पश्‍चिम, दक्षिण व उत्तर नागपूर या चार विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा  हजारावर मते मिळाली. यापैकी पश्‍चिममध्ये १३ हजार तर दक्षिण-पश्‍चिममध्ये १४ हजारांचा आकडा पार केला. पहिल्याच निवडणुकीत ‘आप’ला  मिळालेली मते पाहता विधानसभा निवडणुकीत निश्‍चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा कार्यकर्त्यांंंंना आहे.  त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले  आहेत. मात्र, ऐनवेळी कॅप्टननेच माघार घेतल्याच्या बातमीने ‘आप’ची टीम नागपूर हतबल झाली.   आता कुणाच्या हाती नागपूरचे पालकत्व जाईल,  ती व्यक्ती कार्यकर्त्यांंंंंना किती समजून घेईल, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांंंंंच्या मनात घुसमटत राहिले. मात्र, दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्रीच्या हवेत जसा गारवा जाणवतो तसाच गारवा देणारे मॅसेज रात्री कार्यकर्त्यांंंंंना आले. दमानिया यांनी राजी झाल्या  आहेत. त्यांनी राजीनामा परत घेतला आहे. दिवसभर खचलेले कार्यकर्ते हे मॅसेज वाचून पुन्हा हिमतीने उभे राहिले. (प्रतिनिधी)