शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

By admin | Updated: June 6, 2014 01:01 IST

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’

दिवसभर संभ्रम : रात्री मात्र दिलासा नागपूर : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच  कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’मध्ये दम कसा भरायचा, याचीच चिंता कार्यकर्त्यांंंंना दिवसभर  सतावत राहिली. रात्री उशीरा राजीनामा परत घेतल्याचे मॅसेजेस आले आणि दिवसभराच्या तापापासून त्यांना काहीसा दिलासा मिळाला. दमानिया यांना नागपुरात लोकसभा निवडणुकीत  ६९ हजारावर मते मिळाली. या बळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी  कार्यकर्त्यांंंंनी चालविली होती. ऐनवेळी राष्ट्रीय चेहरा असलेल्या दमानियांनी साथ सोडल्याचे मॅसेजेस आले आणि कार्यकर्त्यांंंंचे मनोबल खचले.   ‘आप’वर विश्‍वास विश्‍वास दाखविणारे मतदारही नाराज झाले. खासगी चर्चेत  ‘आप या आये किसलिए ? ’ असा सवाल ते दमानियांच्या संदर्भात  करू लागले. आपण मुंबईच्या रहिवासी असलो तरी नागपूरकरांच्या संपर्कात राहू असे सांगणार्‍या दमानिया यांनी लोकसभेचे मतदान झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी  नागपूर सोडले. सव्वा महिन्यांनी निकालाच्या आदल्या दिवशी त्या नागपुरात आल्या. निकाल पाहिला आणि मुंबईला परतल्या.  ना पराभवाची  कारणमीमांसा केली ना कार्यकर्त्यांंंंंच्या भावना जाणून घेतल्या. आता मध्येच राजीनामा देऊन त्या मोकळ्या झाल्या. एखादा नेता असे कसा काय करू  शकतो, अशीच चर्चा कार्यकर्ते व मतदारांमध्ये होती. दमानिया यांना नागपुरात ६९ हजारावर मते मिळाली. पश्‍चिम, दक्षिण- पश्‍चिम, दक्षिण व उत्तर नागपूर या चार विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा  हजारावर मते मिळाली. यापैकी पश्‍चिममध्ये १३ हजार तर दक्षिण-पश्‍चिममध्ये १४ हजारांचा आकडा पार केला. पहिल्याच निवडणुकीत ‘आप’ला  मिळालेली मते पाहता विधानसभा निवडणुकीत निश्‍चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा कार्यकर्त्यांंंंना आहे.  त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले  आहेत. मात्र, ऐनवेळी कॅप्टननेच माघार घेतल्याच्या बातमीने ‘आप’ची टीम नागपूर हतबल झाली.   आता कुणाच्या हाती नागपूरचे पालकत्व जाईल,  ती व्यक्ती कार्यकर्त्यांंंंंना किती समजून घेईल, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांंंंंच्या मनात घुसमटत राहिले. मात्र, दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्रीच्या हवेत जसा गारवा जाणवतो तसाच गारवा देणारे मॅसेज रात्री कार्यकर्त्यांंंंंना आले. दमानिया यांनी राजी झाल्या  आहेत. त्यांनी राजीनामा परत घेतला आहे. दिवसभर खचलेले कार्यकर्ते हे मॅसेज वाचून पुन्हा हिमतीने उभे राहिले. (प्रतिनिधी)