शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

दमानिया ‘राजी’ - कार्यकर्ते चिंतामुक्त

By admin | Updated: June 6, 2014 01:01 IST

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’

दिवसभर संभ्रम : रात्री मात्र दिलासा नागपूर : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजिका अंजली दमानिया यांनी राजीनामा देत पक्षातून ‘एक्झिट’ केल्याचे वृत्त नागपुरात पोहचताच  कार्यकर्ते हिरमुसले. दिवसभर विचारात बुडाले. दमानियाच नसणार तर नागपुरात ‘आप’मध्ये दम कसा भरायचा, याचीच चिंता कार्यकर्त्यांंंंना दिवसभर  सतावत राहिली. रात्री उशीरा राजीनामा परत घेतल्याचे मॅसेजेस आले आणि दिवसभराच्या तापापासून त्यांना काहीसा दिलासा मिळाला. दमानिया यांना नागपुरात लोकसभा निवडणुकीत  ६९ हजारावर मते मिळाली. या बळावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी  कार्यकर्त्यांंंंनी चालविली होती. ऐनवेळी राष्ट्रीय चेहरा असलेल्या दमानियांनी साथ सोडल्याचे मॅसेजेस आले आणि कार्यकर्त्यांंंंचे मनोबल खचले.   ‘आप’वर विश्‍वास विश्‍वास दाखविणारे मतदारही नाराज झाले. खासगी चर्चेत  ‘आप या आये किसलिए ? ’ असा सवाल ते दमानियांच्या संदर्भात  करू लागले. आपण मुंबईच्या रहिवासी असलो तरी नागपूरकरांच्या संपर्कात राहू असे सांगणार्‍या दमानिया यांनी लोकसभेचे मतदान झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी  नागपूर सोडले. सव्वा महिन्यांनी निकालाच्या आदल्या दिवशी त्या नागपुरात आल्या. निकाल पाहिला आणि मुंबईला परतल्या.  ना पराभवाची  कारणमीमांसा केली ना कार्यकर्त्यांंंंंच्या भावना जाणून घेतल्या. आता मध्येच राजीनामा देऊन त्या मोकळ्या झाल्या. एखादा नेता असे कसा काय करू  शकतो, अशीच चर्चा कार्यकर्ते व मतदारांमध्ये होती. दमानिया यांना नागपुरात ६९ हजारावर मते मिळाली. पश्‍चिम, दक्षिण- पश्‍चिम, दक्षिण व उत्तर नागपूर या चार विधानसभा मतदारसंघात ‘आप’ला दहा  हजारावर मते मिळाली. यापैकी पश्‍चिममध्ये १३ हजार तर दक्षिण-पश्‍चिममध्ये १४ हजारांचा आकडा पार केला. पहिल्याच निवडणुकीत ‘आप’ला  मिळालेली मते पाहता विधानसभा निवडणुकीत निश्‍चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा कार्यकर्त्यांंंंना आहे.  त्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले  आहेत. मात्र, ऐनवेळी कॅप्टननेच माघार घेतल्याच्या बातमीने ‘आप’ची टीम नागपूर हतबल झाली.   आता कुणाच्या हाती नागपूरचे पालकत्व जाईल,  ती व्यक्ती कार्यकर्त्यांंंंंना किती समजून घेईल, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांंंंंच्या मनात घुसमटत राहिले. मात्र, दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्रीच्या हवेत जसा गारवा जाणवतो तसाच गारवा देणारे मॅसेज रात्री कार्यकर्त्यांंंंंना आले. दमानिया यांनी राजी झाल्या  आहेत. त्यांनी राजीनामा परत घेतला आहे. दिवसभर खचलेले कार्यकर्ते हे मॅसेज वाचून पुन्हा हिमतीने उभे राहिले. (प्रतिनिधी)