शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दलित तरुण नेतृत्व काँग्रेससोबत जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:29 IST

देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मिळू शकते. त्यामुळे राज्यातील दलित तरुणांचे नेतृत्व काँग्रेससोबत जोडण्याचे पूर्ण प्रयत्न राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य व राज्याचे माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे यांनी दिली.

ठळक मुद्देउत्तम खोब्रागडे : ‘ईव्हीएम’वर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मिळू शकते. त्यामुळे राज्यातील दलित तरुणांचे नेतृत्व काँग्रेससोबत जोडण्याचे पूर्ण प्रयत्न राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य व राज्याचे माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे यांनी दिली. सोमवारी खोब्रागडे यांनी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चेदरम्यान त्यांनी राज्यातील निवडणुकांसंदर्भातील धोरण, बहुजन नेतृत्व तसेच राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.आपल्या देशात लोकशाहीचे मूळ संकेतच धोक्यात आले आहे. रोहित वेमुला, गुना इत्यादी प्रकरणे पाहिली तर दलितांना गुलाम बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. हे प्रकार थांबविण्याची मानसिकता आणि क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस पक्ष आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आहे. त्यामुळे दलित तरुण जास्तीत जास्त प्रमाणात काँग्रेसशी जुळला पाहिजे हेच समाजाच्या हिताचे आहे, असे खोब्रागडे म्हणाले.प्रकाश आंबेडकरांसह समविचारी पक्षांना जोडणारउत्तर प्रदेशात मायावती यांनी सपासोबत आघाडी करून अतिशय समजूतदारीची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातदेखील याची आवश्यकता आहे. राज्यात दलित मतांचे विभाजन होते आणि त्याचा फायदा दलितविरोधी शक्तींना मिळतो. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची वेगळी ताकद आहे. त्यांच्यासह सपा, बसपा यासारखे समविचारी पक्ष एकत्र येणे हे दलित समाज व राज्यासाठी भल्याचे ठरणार आहे. या सर्वांना जोडण्यासाठी काँग्रेसतर्फे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत, असे उत्तम खोब्रागडे म्हणाले.रामदास आठवलेंनी भ्रमनिरास केलासेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल यासाठी रामदास आठवले यांचे निमंत्रण स्वीकारले व ‘रिपाइं’शी जुळलो. परंतु प्रत्यक्षात रोहित वेमुलासह दलित अत्याचाराच्या विरोधात आठवले यांनी शब्दही काढला नाही. नोटाबंदीच्या वेळी दलित, शोषित अडचणीत सापडला. मात्र त्यावेळीदेखील त्यांनी मौन ठेवले. त्यांना केवळ आपल्या खुर्ची टिकवायची आहे. दलितांच्या नावावर ‘रिपाइं’ची दुकानदारीच सुरू आहे. प्रत्यक्षात दलितांशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही, असा घणाघाती प्रहार उत्तम खोब्रागडे यांनी केला.सुस्थापितांनी आरक्षण नाकारावेदलित समाज मुख्य प्रवाहात यावा, यासाठी आरक्षण लागू करण्यात आले होते. अजूनही अनेकांना आरक्षणाच्या लाभाची आवश्यकता आहे. परंतु जे दलित सुस्थापित झाले आहेत, त्यांनी आरक्षण नाकारण्यासंदर्भात सामाजिक पुढाकार घेतला पाहिजे, असे उत्तम खोब्रागडे म्हणाले.‘ईव्हीएम’बाबत लोकांच्या शंकांचे निरसन व्हावेदेशात नि:पक्ष व पारदर्शी निवडणुका व्हाव्यात ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. देशातील अनेक लोकांना ‘ईव्हीएम’बाबत सांशकता आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकांचे निरसन करायला हवे. शासन व निवडणूक आयोग लोकांचे म्हणणे ऐकत नसतील तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम मशीनवरच बहिष्कार घालावा. ‘ईव्हीएम’ असेल तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, अशी भूमिका सर्व विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे, असे खोब्रागडे म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर