शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दलित तरुण नेतृत्व काँग्रेससोबत जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:29 IST

देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मिळू शकते. त्यामुळे राज्यातील दलित तरुणांचे नेतृत्व काँग्रेससोबत जोडण्याचे पूर्ण प्रयत्न राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य व राज्याचे माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे यांनी दिली.

ठळक मुद्देउत्तम खोब्रागडे : ‘ईव्हीएम’वर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मिळू शकते. त्यामुळे राज्यातील दलित तरुणांचे नेतृत्व काँग्रेससोबत जोडण्याचे पूर्ण प्रयत्न राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य व राज्याचे माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे यांनी दिली. सोमवारी खोब्रागडे यांनी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चेदरम्यान त्यांनी राज्यातील निवडणुकांसंदर्भातील धोरण, बहुजन नेतृत्व तसेच राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.आपल्या देशात लोकशाहीचे मूळ संकेतच धोक्यात आले आहे. रोहित वेमुला, गुना इत्यादी प्रकरणे पाहिली तर दलितांना गुलाम बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. हे प्रकार थांबविण्याची मानसिकता आणि क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस पक्ष आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आहे. त्यामुळे दलित तरुण जास्तीत जास्त प्रमाणात काँग्रेसशी जुळला पाहिजे हेच समाजाच्या हिताचे आहे, असे खोब्रागडे म्हणाले.प्रकाश आंबेडकरांसह समविचारी पक्षांना जोडणारउत्तर प्रदेशात मायावती यांनी सपासोबत आघाडी करून अतिशय समजूतदारीची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातदेखील याची आवश्यकता आहे. राज्यात दलित मतांचे विभाजन होते आणि त्याचा फायदा दलितविरोधी शक्तींना मिळतो. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची वेगळी ताकद आहे. त्यांच्यासह सपा, बसपा यासारखे समविचारी पक्ष एकत्र येणे हे दलित समाज व राज्यासाठी भल्याचे ठरणार आहे. या सर्वांना जोडण्यासाठी काँग्रेसतर्फे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत, असे उत्तम खोब्रागडे म्हणाले.रामदास आठवलेंनी भ्रमनिरास केलासेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल यासाठी रामदास आठवले यांचे निमंत्रण स्वीकारले व ‘रिपाइं’शी जुळलो. परंतु प्रत्यक्षात रोहित वेमुलासह दलित अत्याचाराच्या विरोधात आठवले यांनी शब्दही काढला नाही. नोटाबंदीच्या वेळी दलित, शोषित अडचणीत सापडला. मात्र त्यावेळीदेखील त्यांनी मौन ठेवले. त्यांना केवळ आपल्या खुर्ची टिकवायची आहे. दलितांच्या नावावर ‘रिपाइं’ची दुकानदारीच सुरू आहे. प्रत्यक्षात दलितांशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही, असा घणाघाती प्रहार उत्तम खोब्रागडे यांनी केला.सुस्थापितांनी आरक्षण नाकारावेदलित समाज मुख्य प्रवाहात यावा, यासाठी आरक्षण लागू करण्यात आले होते. अजूनही अनेकांना आरक्षणाच्या लाभाची आवश्यकता आहे. परंतु जे दलित सुस्थापित झाले आहेत, त्यांनी आरक्षण नाकारण्यासंदर्भात सामाजिक पुढाकार घेतला पाहिजे, असे उत्तम खोब्रागडे म्हणाले.‘ईव्हीएम’बाबत लोकांच्या शंकांचे निरसन व्हावेदेशात नि:पक्ष व पारदर्शी निवडणुका व्हाव्यात ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. देशातील अनेक लोकांना ‘ईव्हीएम’बाबत सांशकता आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकांचे निरसन करायला हवे. शासन व निवडणूक आयोग लोकांचे म्हणणे ऐकत नसतील तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम मशीनवरच बहिष्कार घालावा. ‘ईव्हीएम’ असेल तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, अशी भूमिका सर्व विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे, असे खोब्रागडे म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर