शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 08:30 IST

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्दे१२४२ नवे रुग्ण, ५० मृतांची नोंदरुग्णांची संख्या ३३१७२ तर मृतांची संख्या १०४३

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भावरील कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गुरुवारी मृतांच्या आकड्याने हजाराचा आकडा पार केला. यात ५० रुग्णांच्या मृत्यूची भर पडल्याने बळींची संख्या १०४३ वर पोहचली. १२४२ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ३३१७२ झाली. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्येचे भयावह आकडे समोर येत आहे.  ९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. रुग्णसंख्या १७७२२ झाली असून मृतांची संख्या ६२५ वर गेली आहे. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २४८२ झाली. चंद्रपूर जिल्ह्यात ५४ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२४९ तर मृतांची संख्या १३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ४६ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. बाधितांची संख्या ५१२ वर पोहचली. बुलडाणा जिल्ह्यात ४२ रुग्ण व एकाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या २४३७ तर मृतांची संख्या ४१ झाली. गोंदिया जिल्ह्यात ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ९०२ झाली तर एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या १२ वर पोहचली. भंडारा जिल्ह्यात ३० रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या ६९५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृत्यूची संख्या १० झाली. अमरावतीमध्ये २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या ४१६१वर गेली. या शिवाय, अकोल्यात १४, गडचिरोलीत १० रुग्णांची नोंद झाली, तर वाशिम जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही.मराठवाडा, खान्देशच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमीमराठवाडा, खान्देशच्या तुलनेत विदर्भात मृत्यूची संख्या कमी आहे. गुरुवारी खान्देशात १८०३, मराठवाड्यात १३०६ तर विदर्भात १०४३ मृत्यूची नोंद झाली. नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात कमी मृत्यू आहेत. नागपुरातील सहा जिल्हे मिळून ६७५ तर अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ३६८ मृत्यू झाले आहेत.-असा गाठला मृत्यूचा आकडा महिना मृत्यूसंख्या मार्च १एप्रिल १२मे ५४जून ९१जुलै २२९आॅगस्ट ६५६

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस