शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात महिला अत्याचाराचे गुन्हे जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:25 AM

Crime Nagpur News गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे.

ठळक मुद्देहाथरसच्या घटनेनंतर मुद्दा ऐरणीवरशहर आणि जिल्ह्यातील वास्तव

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हाथरसच्या घटनेनंतर ठिकठिकाणच्या महिला अत्याचाराच्या घटनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळीच्या घटना सुद्धा चचेला आल्या आहेत. गेल्या ९ महिन्यात नागपुरात महिला अत्याचाराच्या एकूण ३५६ घटना घडल्या आहेत तर नागपूर जिल्ह्यात हा आकडा २६९ आहे. यावरून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील गुन्हेगार जास्त निर्ढावलेले आहेत, हे यातून स्पष्ट होते.कायदे कितीही कठोर केले तरी गुन्हेगारांची विकृती कमी व्हायला तयार नाही गुन्हेगारांच्या विकृतीचा ग्राफ सारखा वाढत असल्याचे सर्वत्र दिसून येते. त्याला अनेक कारणे असली तरी मोकाट सुटलेले गुन्हेगार महिलांना सॉफ्ट टार्गेट मानतात. बदनामीच्या धाकाने त्या पोलिसांत तक्रार करणार नाही, असे त्यांना वाटते. दुसरे म्हणजे, त्यांना कायद्याचा धाक वाटत नाही.राजकीय घोषणामहिला अत्याचाराची गंभीर घटना घडली की, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, आरोपींना तातडीने शिक्षा होईल, यासाठी अमुक करू, तमुक करू, नेते मंडळी अशा घोषणा करतात. मात्र तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य होत नाही. गुन्हेगारांना तातडीने आणि कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते जास्त निर्ढावतात.महिला-मुलींच्या अत्याचाराच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये संवेदनशीलपणे आणि सहृदयतेने तपास करण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल, असे भक्कम पुरावे गोळा करण्याबाबत सर्व पोलीस अधिका-यांना सूचना देण्यात आल्या आहेत.सुनील फुलारीअतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, नागपूर)

 

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिला