शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडवा; नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 12:24 IST

ॲग्रोव्हिजनचा समारोपीय कार्यक्रम; हंसराज अहीर, चंद्रशेखर बावनकुळे, अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी यांची उपस्थिती

नागपूर : कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी पुढाकार घेऊन काम करा व त्यातून सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ॲग्रो व्हिजनच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी, माजी खा.शिशुपाल पटले, माजी खा.डॉ. विकास महात्मे, मापसूचे कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर, गिरीश गांधी, रमेश मानकर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, ॲग्रोव्हिजन १३ वर्षांपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या वर्षी जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. ३५ कार्यशाळांमधून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. येत्या काळात केवळ प्रदर्शन नव्हे, तर वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲग्रोव्हिजनचे कार्यालय, तसेच सेंद्रीय बाजाराची स्थापना करण्यात येत आहे. या सोयींमुळे सातत्य कायम राहील आणि वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत राहील.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भाच्या कृषी प्रगतीत ॲग्रोव्हिजनचा मोठा वाटा आणि सहभाग असल्याचे सांगितले. अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी म्हणाले, ईशान्य भारतातील राज्यांना कृषिविषयक मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी सातत्याने करतात. हंसराज अहीर म्हणाले, ॲग्रोव्हिजनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती आली आहे. शेतकरी जागृत आणि अभ्यासू होत आहे. प्रारंभी रवींद्र बोरटकर यांनी प्रदर्शनातील घडामोडींचा आढावा घेतला. संचालन रेणुका देशकर यांनी, तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

निबंध स्पर्धेतील विजेते सायली देशमुख, वृषभ शेंडे, श्वेता डोंगलीकर, शेतकरी पुरस्कार गटात शुभम इमले, प्रियांका मेंढे व रेखा पांडव यांना प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबत प्रायोजकांचा सत्कारही करण्यात आला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीFarmerशेतकरीnagpurनागपूरagricultureशेती