शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

फटाक्यांमुळे नागपुरात ११ ठिकाणी आग लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:17 IST

दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सामानाला मोठी आग लागली. यासह फटाक्यामुळे शहरात विविध ११ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविल्याने कोटवधीची हानी टळली. तसेच गेल्या दोन दिवसात शहरात ठिकठिकाणी आगीच्या लहानमोठ्या अन्य नऊ घटना घडल्या.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली : दोन दिवसात लहानमोठ्या आगीच्या २० घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सामानाला मोठी आग लागली. यासह फटाक्यामुळे शहरात विविध ११ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविल्याने कोटवधीची हानी टळली. तसेच गेल्या दोन दिवसात शहरात ठिकठिकाणी आगीच्या लहानमोठ्या अन्य नऊ घटना घडल्या. 

डागा ले-आऊट कॉर्पोरेशन कॉलनीतील स्केटिंग ग्राऊंडला लागून प्रशासकीय कार्यालय होते. कालांतराने नागपूर सुधार प्रन्यासने सदर जागा रेस्टारंटकरिता दिली. रेस्टॉरंट मालकाने तेथे बांबूचे आणि ताटव्यांचे बांधकाम केले. डागा नगर नागरिक मंडळाने त्याला विरोध केला. त्याबाबत तक्रारी दिल्या. तक्रारीवरून नासुप्रने ते बांधकाम पाडले. मात्र, रेस्टॉरंट मालकाने ते सामान तेथेच साठवून ठेवले. बुधवारी रात्रीच्या सुमारास या सामानाला फटाक्यांमुळे आग लागली. बाजूलाच असलेले डागानगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना केली. लगेच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविले. जरा उशीर झाला असता तर संपूर्ण डागानगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते, असे चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.गेल्या दोन दिवसात फटाक्यामुळे कचऱ्याला आग लागल्याच्या ११ घटना घडल्या. यात व्यंकटेश मंदिर देवाडियाजवळ कचऱ्याला आग लागली. लकडगंज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. अभ्यंकरनगर व्हीएनआयटी चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, जरीपटका पोलीस ठाण्यासमोरील वैभवनगर येथील कचरा, व्हेरायटी चौकात गेसन्ससमोरील कचरा, गुरुदेव नगरातील राजीव गांधी सभागृहासमोरील कचऱ्याला लागलेली आग, वर्धमान नगरातील रेसीडेन्स हॉस्पीटलसमोरील कचरा आग, छोटा ताजबाग एम्पायर बारजवळ कचरा, गांधीबाग पोलीस क्वॉर्टरजवळील वाहतूक सिग्नलजवळील कचरा, मोतीबाग पाचपावली रेल्वे गेटजवळील कचरा, गीतांजली टॉकीजजवळील कचरा, तसेच गोरेवाडा वॉटर फिल्टर प्लान्टजवळ कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडल्या. या सर्व आगीवर अग्निशमन विभागाच्या जवानांनी यशस्वीरीत्या नियंत्रण मिळविण्यात आले.तसेच अन्य घटनांमध्येही अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले. धरमपेठ ट्राफिक पार्क वाय पॉर्इंटजवळ सिलेंडरला आग लागून २५ हजारांचे नुकसान झाले. त्यावरही अग्निशमन विभागाने तत्परतेने नियंत्रण मिळविले. क्रीडा चौकात पकोड्याच्या ठेल्याला आग लागली. त्यावरही नियंत्रण मिळविण्यात यश आले. , सदर छावणी मशीदजवळ घराला लागलेली आग, पांडे ले-आऊटमधील प्रणव ३ अपार्टमेंटमध्ये दिव्यामुळे लागलेली आग, वंजारीनगर येथे भंगार आॅटोला आग लागली. अग्निशमन विभागाने मनुष्यबळाचा अभाव असतानाही योग्य नियोजन केले. कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या. प्रशिक्षणार्थींनाही अग्निशमन केंद्रावर तैनात ठेवले. कार्यालयीन लिपिकांच्याही रजा रद्द करीत रात्रपाळीत कामावर बोलाविले. योग्य नियोजनामुळेच घटना घडताच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्तव्य बजावत शहरातील आगीमुळे होणारी हानी टाळण्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.हॉस्पिटलमधील रुग्ण थोडक्यात बचावलेसुभाषनगर रोड केळकर मानव हॉस्पीटल येथे पहिल्या माळ्यावर आग लागली. येथील १२ पुरुष आणि दोन महिलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यां
ना यश आल्याने रुग्ण थोडक्यात बचावले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुमारे २५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान टळले.दक्षता हाच आग नियंत्रणावर उपाय : महापौरदिवाळीच्या दिवसांत आगीच्या घटना घडत असतात. मात्र, याबाबत मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे वेळोवळी जनजागृती करण्यात आली. दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. यामुळेच यंदाच्या दिवाळीत तुरळक घटना वगळता कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. तत्परता दाखविणारे अग्निशमन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि वेळीच विभागाला सूचना देणारे चंद्रपाल चौकसे यांच्यासारखे दक्ष नागरिक यांच्यामुळेच सुदैवाने दुर्घटना घडलेली नाही. या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

टॅग्स :fire crackerफटाकेnagpurनागपूर