शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

१८८ वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी न्यायालय सजग ; मनपाला जबाबदारी नक्की करायला आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:59 IST

विकासाला नाही विरोध, पण वटवृक्ष जगलाच पाहिजे! : हायकोर्टाचा स्पष्ट संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली येथील ठक्करग्राम ई-लायब्ररीच्या परिसरामधील १८८ वर्षे जुन्या वटवृक्षाला दुसऱ्या ठिकाणी जगवण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यासंदर्भात जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट करून ही जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याची राहील, असा प्रश्न महानगरपालिकेला विचारला. तसेच, यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

संवर्धन शहरातील वृक्षांचे करण्यासाठी प्रीती पटेल, कुणाल तांबुळकर, दिनेश शिंदे व यश नेटके या जागृत नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वृक्ष गरज नसताना तोडली जाऊ शकतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपाने स्ट्रक्चरल इंजिनीअरच्या अहवालानुसार ई-लायब्ररी इमारतीच्या सुरक्षेकरिता वटवृक्ष स्थानांतरित करणे आवश्यक आहे, असा दावा केला. तसेच, पर्यावरणतज्ज्ञाने वटवृक्ष स्थानांतरित करणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला आहे, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे न्यायालयाने मनपाला संबंधित प्रतिज्ञापत्र मागितले. प्रतिज्ञापत्रात जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व पदाची माहिती द्यावी आणि त्या अधिकाऱ्याची स्वाक्षरीही घ्यावी, असे सांगितले. 

वटवृक्षाचे महत्त्व माहिती आहे का ?एक वटवृक्ष किती ऑक्सिजन देतो, त्याची उपयोगिता किती आहे याची माहिती घ्या, असेही न्यायालय मनपाला म्हणाले. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण वटवृक्ष जगणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. वटवृक्ष जगणे सर्वांच्या फायद्याचे आहे, असेदेखील नमूद केले.

टॅग्स :nagpurनागपूर