शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

१८८ वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी न्यायालय सजग ; मनपाला जबाबदारी नक्की करायला आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:59 IST

विकासाला नाही विरोध, पण वटवृक्ष जगलाच पाहिजे! : हायकोर्टाचा स्पष्ट संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली येथील ठक्करग्राम ई-लायब्ररीच्या परिसरामधील १८८ वर्षे जुन्या वटवृक्षाला दुसऱ्या ठिकाणी जगवण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यासंदर्भात जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट करून ही जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याची राहील, असा प्रश्न महानगरपालिकेला विचारला. तसेच, यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

संवर्धन शहरातील वृक्षांचे करण्यासाठी प्रीती पटेल, कुणाल तांबुळकर, दिनेश शिंदे व यश नेटके या जागृत नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वृक्ष गरज नसताना तोडली जाऊ शकतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपाने स्ट्रक्चरल इंजिनीअरच्या अहवालानुसार ई-लायब्ररी इमारतीच्या सुरक्षेकरिता वटवृक्ष स्थानांतरित करणे आवश्यक आहे, असा दावा केला. तसेच, पर्यावरणतज्ज्ञाने वटवृक्ष स्थानांतरित करणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला आहे, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे न्यायालयाने मनपाला संबंधित प्रतिज्ञापत्र मागितले. प्रतिज्ञापत्रात जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व पदाची माहिती द्यावी आणि त्या अधिकाऱ्याची स्वाक्षरीही घ्यावी, असे सांगितले. 

वटवृक्षाचे महत्त्व माहिती आहे का ?एक वटवृक्ष किती ऑक्सिजन देतो, त्याची उपयोगिता किती आहे याची माहिती घ्या, असेही न्यायालय मनपाला म्हणाले. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण वटवृक्ष जगणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. वटवृक्ष जगणे सर्वांच्या फायद्याचे आहे, असेदेखील नमूद केले.

टॅग्स :nagpurनागपूर