शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

१८८ वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी न्यायालय सजग ; मनपाला जबाबदारी नक्की करायला आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:59 IST

विकासाला नाही विरोध, पण वटवृक्ष जगलाच पाहिजे! : हायकोर्टाचा स्पष्ट संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली येथील ठक्करग्राम ई-लायब्ररीच्या परिसरामधील १८८ वर्षे जुन्या वटवृक्षाला दुसऱ्या ठिकाणी जगवण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यासंदर्भात जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट करून ही जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याची राहील, असा प्रश्न महानगरपालिकेला विचारला. तसेच, यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

संवर्धन शहरातील वृक्षांचे करण्यासाठी प्रीती पटेल, कुणाल तांबुळकर, दिनेश शिंदे व यश नेटके या जागृत नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वृक्ष गरज नसताना तोडली जाऊ शकतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपाने स्ट्रक्चरल इंजिनीअरच्या अहवालानुसार ई-लायब्ररी इमारतीच्या सुरक्षेकरिता वटवृक्ष स्थानांतरित करणे आवश्यक आहे, असा दावा केला. तसेच, पर्यावरणतज्ज्ञाने वटवृक्ष स्थानांतरित करणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला आहे, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे न्यायालयाने मनपाला संबंधित प्रतिज्ञापत्र मागितले. प्रतिज्ञापत्रात जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व पदाची माहिती द्यावी आणि त्या अधिकाऱ्याची स्वाक्षरीही घ्यावी, असे सांगितले. 

वटवृक्षाचे महत्त्व माहिती आहे का ?एक वटवृक्ष किती ऑक्सिजन देतो, त्याची उपयोगिता किती आहे याची माहिती घ्या, असेही न्यायालय मनपाला म्हणाले. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण वटवृक्ष जगणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. वटवृक्ष जगणे सर्वांच्या फायद्याचे आहे, असेदेखील नमूद केले.

टॅग्स :nagpurनागपूर