शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Corona Virus in Nagpur; देश निश्चित ‘कोरोना’वर मात करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय जनता पक्षाची स्थापना ही सत्तापरिवर्तनासाठी नाही तर समाज व देशात सकारात्मक बदल घडविण्याच्या ...

ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांनी गरिबांच्या पाठीशी उभे राहावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षाची स्थापना ही सत्तापरिवर्तनासाठी नाही तर समाज व देशात सकारात्मक बदल घडविण्याच्या संकल्पातून झाली आहे. सध्या संपूर्ण जग ‘कोरोना’चा सामना करत आहे. अशा स्थितीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गरिबांच्या मदतीसाठी उभे राहायला हवे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच देश निश्चितपणे ‘कोरोना’वर मात करेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. भाजपच्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त त्यांनी सोमवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.‘कोरोना’मुळे गरिबांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार डोळ्यासमोर ठेवून कार्य करा व समाजातील गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी पक्षाची लोकसेवा, लोकशिक्षण व लोकसंघर्षाची त्रिसूत्री पाळावी आणि सेवेसाठी पूर्ण योगदान द्यावे. ‘कोरोना’ची गंभीरता लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनीदेखील ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले पाहिजे, अशी सूचनादेखील त्यांनी केली.पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश ‘सुपर इकॉनॉमी’ बनेलसर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागातून भाजप घडला. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रगती व विकासाकडे देश अग्रेसर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश ‘सुपर इकॉनॉमी’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNitin Gadkariनितीन गडकरी