शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

‘सेबी'मुळे कापसाच्या दरात ८०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

By सुनील चरपे | Updated: January 23, 2023 17:11 IST

वायदे बाजारातील साैद्यांवर बंदी

नागपूर : ‘सेबी' (सेक्युरिटीज् ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया)ने वायदे बाजारातून कापसाला न वगळता १ जानेवारी २०२३ व नंतरच्या साैद्यांवर बंदी घातली. त्यामुळे संदर्भ किंमत मिळणे बंद झाल्याने देशातील कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दुसरीकडे, कापसाचे दर दबावात आल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांचे नुकसान साेसावे लागत आहे.

देशातील कापड उद्याेगाला कमी दरात कापूस हवा असल्याने त्यांनी कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी काॅटन आसाेसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला हाेता. त्यासाठी कापूस व सुताचा तुटवडा असल्याचा हवाला दिला हाेता. याच दबावामुळे सप्टेंबर व ऑक्टाेबर २०२२ या काळात कापसावरील ११ टक्के आयात शुल्क तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला हाेता. या काळात कापड उद्याेजकांनी २० लाख गाठी कापसाची व सुताची आयात करून पुरेसा साठा केला.

या साठ्यामुळे कापसाचे दर सुरुवातीपासून दबावात राहिले. जानेवारीपासून दरवाढ हाेण्याचे संकेत मिळताच 'सेबी'ने कापसाच्या जानेवारी व त्यानंतरच्या साैद्यांवर बंदी घातली. त्यामुळे संदर्भ किंमत मिळणे व वायदे 'राेल ओव्हर' हाेणे बंद हाेऊन भविष्यातील दराबाबत अंदाज बांधणे अशक्य झाले. त्यामुळे कापसाचे दर प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांनी दबावात आले.

बंदी न घातला बदल करणे शक्य

सेबीच्या मुंबईस्थित कार्यालयात २७ ऑगस्ट २०२२ राेजी बैठक पार पडली. वायदे बाजारात काही महत्त्वाचे बदल करणे व त्यासाठी ३० दिवसांचा काळ लागणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. कापसाच्या साैद्यांवर १ जानेवारी २०२३ पासून बंदी घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. बंदी न घालता महत्त्वाचे बदल सेबीला विशिष्ट तारखेपासून लागू करता आले असते.

टेक्सटाईल व गारमेंट लाॅबीचा दबाव

मागील हंगामात कापसाच्या दराने प्रति क्विंटल ९ हजार रुपयांची पातळी ओलांडताच साऊथ इंडिया मिल्स असाेसिएशन, तिरुपूर एक्स्पाेर्टर असाेसिएशन तसेच टेक्सटाईल व गारमेंट लाॅबीने कापसाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला हाेता. त्यावेळी याबाबत कुठलाही निर्णय घेतला नव्हता. यावर्षी या लाॅबीच्या दबावामुळे 'सेबी'ने कापसाच्या साैद्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे बाजार तज्ज्ञांनी सांगितले.

शेतमालाच्या वायद्यांवर बंदी घालणे ही कृती 'सेबी'च्या मुख्य उद्देशाला छेद देणारी आहे. 'सेबी'ने वायदे बाजाराचे संवर्धन व गुंतवणूदारांचे संरक्षण करण्यासाठी नियमन करावे, बंदी घालू नये. केंद्र सरकार 'सेबी'चा वापर शेतमालाचे भाव पाडण्यासाठी करीत आहे.

- ललित बहाळे, अध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी