शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कॉटन मार्केट शनिवारपासून पुन्हा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 9:50 PM

जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जवळपास ५० दिवसानंतर सुरू झालेले कॉटन मार्केट गेल्या आठवड्यात केवळ एकच दिवस सुरू राहिले. आक्षेपानंतर अडतियांनी व्यवसाय करण्यास नकार दिल्याने बंद करण्यात आले. मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा शनिवारपासून मार्केट सुरू होणार आहे. मार्केट गुरुवारपासून सुरू होणार होते, पण बुघवारी आग लागल्याने शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला आहे.बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाल्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी मनपा आयुक्तांनी २८ मार्चपासून कॉटन मार्केट बंद करून शेतकऱ्यांसाठी शहरातील दहा जागेत बाजाराची निर्मिती करून भाज्यांची विक्री सुरू केली होती. पण या बाजारांनाही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने धंतोली यशवंत स्टेडियम येथील बाजार वगळता सर्वच बाजार बंद झाले. काही सुरूच झाले नाहीत. अडतियांच्या मागणीनंतर गेल्या आठवड्यात मार्केट सुरू झाले, पण मनपा कर्मचाऱ्यांचा अडतियांसोबत झालेला वाद आणि दरदिवशी केवळ ४० अडतियांना व्यवसायाची परवानगी दिल्यानंतर एकाच दिवसात मार्केट बंद करण्याचा निर्णय अडतियांनी घेतला. मार्केटमध्ये ८० अडतिये कार्यरत असताना मनपा अधिकाऱ्यांनी २४० जणांची यादी तयार करून प्रत्येक अडतियाला आठवड्यानंतर व्यवसायाची परवानगी दिली होती. यावरही अडतियांनी आक्षेप घेतला होता.महात्मा फुले अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, मार्केटमध्ये व्यवसायाची परवानगी बुधवारी मिळाली. गुरुवारपासून व्यवसाय करणे शक्य नाही. भाजी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात भाज्या विक्रीसाठी आणण्यासाठी कळविण्यात येत आहे. आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री शनिवारपासून सुरू होणार आहे. एकाच छताखाली भाज्यांची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांनाही किफायत भावात भाज्या मिळतील, शिवाय अडतिये आणि व्यापाऱ्यांनाही उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक साखळी पूर्ण होणार आहे. मार्केटमध्ये आगीच्या घटना वाढत आहे. बुधवारी २५ व्यापाऱ्यांची दुकाने जळाली असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापाऱ्यांना पक्की दुकाने बांधून द्यावीत, अशी मागणी महाजन यांनी केली.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट