शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘ट्रेसिंग’चे गांभीर्य नाही, बाधित रुग्ण सैराट, आठ दिवसांत ५२,७९१ रुग्ण; ४९९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:59 IST

coronavirus in Nagpur : ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

- सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ५२,७९१ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४९९         रुग्णांचे जीव गेले. आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा व मृत्यूसंख्येचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या स्थितीत ६४ हजार ६४१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान  आहे. (no seriousness of ‘tracing’, infected patient Sairat, 52,791 patients in eight days; 499 deaths)ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

सोशल पोलीस नावालाच nगृह विलगीकरणातील ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या रामभरोसे आहेत. त्यापैकी बहुतेक जण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. nअशा बाधितांवर वॉच ठेवण्यासाठी सोशल पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, हे सोशल पोलिसिंग केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. दोन हजारांच्या दंडासह फौजदारी कारवाईचा इशाराही कमी पडत आहे. 

प्रशासनाची अहवालांबाबत उदासीनताजानेवारी-फेब्रुवारीत लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम धडाक्यात झाले. मॉल्स, दुकाने, पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. खासगी वाहनांतून लोकांचा प्रवास. ब्रिटनहून नागपूर-विदर्भात दाखल प्रवासी पॉझिटिव्ह येऊनही त्यांचा अहवाल देण्यास प्रशासनाने उदासीनता दाखवली.  

नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ८०० ते ९०० नवे रुग्ण दिसून येत आहेत.  

वाशिम जिल्ह्यात ४०० ते ५००, अकोल्यात ३५० ते ४५०, यवतमाळ जिल्ह्यात ४५० ते ५५०, अमरावती जिल्ह्यात २५० ते ३५०,  वर्धा जिल्ह्यात २०० ते २५०, वर्धा व भंडारा जिल्ह्यात १५० ते २००, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे. 

टाळेबंदी, संचारबंदीनंतरही कोरोनाचा स्फोट होण्याची ही आहेत कारणे... कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’. ‘सैराट’ होऊन शहरात अनिर्बंध वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण.दुसरी लाट येण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश.रस्त्यांवर, बाजारात गर्दी करणाऱ्या लोकांना मास्कचे गांभीर्य नसणे. सॅनिटायझरचा कमी झालेला वापर.सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता. 

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटकडे दुर्लक्ष शनिवार व रविवार स्वयंस्फूर्त बंदचे आवाहन केले गेले. मात्र, इतर दिवशी गर्दीने फुललेल्या बाजारपेठा व विविध कार्यक्रमांकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आले. पण, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर