शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

coronavirus: ‘ट्रेसिंग’चे गांभीर्य नाही, बाधित रुग्ण सैराट, आठ दिवसांत ५२,७९१ रुग्ण; ४९९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:59 IST

coronavirus in Nagpur : ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

- सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ५२,७९१ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४९९         रुग्णांचे जीव गेले. आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा व मृत्यूसंख्येचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या स्थितीत ६४ हजार ६४१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान  आहे. (no seriousness of ‘tracing’, infected patient Sairat, 52,791 patients in eight days; 499 deaths)ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

सोशल पोलीस नावालाच nगृह विलगीकरणातील ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या रामभरोसे आहेत. त्यापैकी बहुतेक जण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. nअशा बाधितांवर वॉच ठेवण्यासाठी सोशल पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, हे सोशल पोलिसिंग केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. दोन हजारांच्या दंडासह फौजदारी कारवाईचा इशाराही कमी पडत आहे. 

प्रशासनाची अहवालांबाबत उदासीनताजानेवारी-फेब्रुवारीत लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम धडाक्यात झाले. मॉल्स, दुकाने, पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. खासगी वाहनांतून लोकांचा प्रवास. ब्रिटनहून नागपूर-विदर्भात दाखल प्रवासी पॉझिटिव्ह येऊनही त्यांचा अहवाल देण्यास प्रशासनाने उदासीनता दाखवली.  

नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ८०० ते ९०० नवे रुग्ण दिसून येत आहेत.  

वाशिम जिल्ह्यात ४०० ते ५००, अकोल्यात ३५० ते ४५०, यवतमाळ जिल्ह्यात ४५० ते ५५०, अमरावती जिल्ह्यात २५० ते ३५०,  वर्धा जिल्ह्यात २०० ते २५०, वर्धा व भंडारा जिल्ह्यात १५० ते २००, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे. 

टाळेबंदी, संचारबंदीनंतरही कोरोनाचा स्फोट होण्याची ही आहेत कारणे... कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’. ‘सैराट’ होऊन शहरात अनिर्बंध वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण.दुसरी लाट येण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश.रस्त्यांवर, बाजारात गर्दी करणाऱ्या लोकांना मास्कचे गांभीर्य नसणे. सॅनिटायझरचा कमी झालेला वापर.सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता. 

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटकडे दुर्लक्ष शनिवार व रविवार स्वयंस्फूर्त बंदचे आवाहन केले गेले. मात्र, इतर दिवशी गर्दीने फुललेल्या बाजारपेठा व विविध कार्यक्रमांकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आले. पण, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर