शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

coronavirus: ‘ट्रेसिंग’चे गांभीर्य नाही, बाधित रुग्ण सैराट, आठ दिवसांत ५२,७९१ रुग्ण; ४९९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:59 IST

coronavirus in Nagpur : ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

- सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ५२,७९१ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४९९         रुग्णांचे जीव गेले. आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा व मृत्यूसंख्येचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या स्थितीत ६४ हजार ६४१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान  आहे. (no seriousness of ‘tracing’, infected patient Sairat, 52,791 patients in eight days; 499 deaths)ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

सोशल पोलीस नावालाच nगृह विलगीकरणातील ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या रामभरोसे आहेत. त्यापैकी बहुतेक जण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. nअशा बाधितांवर वॉच ठेवण्यासाठी सोशल पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, हे सोशल पोलिसिंग केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. दोन हजारांच्या दंडासह फौजदारी कारवाईचा इशाराही कमी पडत आहे. 

प्रशासनाची अहवालांबाबत उदासीनताजानेवारी-फेब्रुवारीत लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम धडाक्यात झाले. मॉल्स, दुकाने, पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. खासगी वाहनांतून लोकांचा प्रवास. ब्रिटनहून नागपूर-विदर्भात दाखल प्रवासी पॉझिटिव्ह येऊनही त्यांचा अहवाल देण्यास प्रशासनाने उदासीनता दाखवली.  

नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ८०० ते ९०० नवे रुग्ण दिसून येत आहेत.  

वाशिम जिल्ह्यात ४०० ते ५००, अकोल्यात ३५० ते ४५०, यवतमाळ जिल्ह्यात ४५० ते ५५०, अमरावती जिल्ह्यात २५० ते ३५०,  वर्धा जिल्ह्यात २०० ते २५०, वर्धा व भंडारा जिल्ह्यात १५० ते २००, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे. 

टाळेबंदी, संचारबंदीनंतरही कोरोनाचा स्फोट होण्याची ही आहेत कारणे... कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’. ‘सैराट’ होऊन शहरात अनिर्बंध वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण.दुसरी लाट येण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश.रस्त्यांवर, बाजारात गर्दी करणाऱ्या लोकांना मास्कचे गांभीर्य नसणे. सॅनिटायझरचा कमी झालेला वापर.सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता. 

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटकडे दुर्लक्ष शनिवार व रविवार स्वयंस्फूर्त बंदचे आवाहन केले गेले. मात्र, इतर दिवशी गर्दीने फुललेल्या बाजारपेठा व विविध कार्यक्रमांकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आले. पण, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर