शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘ट्रेसिंग’चे गांभीर्य नाही, बाधित रुग्ण सैराट, आठ दिवसांत ५२,७९१ रुग्ण; ४९९ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:59 IST

coronavirus in Nagpur : ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

- सुमेध वाघमारेनागपूर : विदर्भातील अकराही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. १९ ते २६ मार्च या सात दिवसांत तब्बल ५२,७९१ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४९९         रुग्णांचे जीव गेले. आतापर्यंतचा रुग्णसंख्येचा व मृत्यूसंख्येचा हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, सध्याच्या स्थितीत ६४ हजार ६४१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात गंभीर रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान  आहे. (no seriousness of ‘tracing’, infected patient Sairat, 52,791 patients in eight days; 499 deaths)ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. परंतु खबरदारीचे उपाययोजना करण्यास कोणीच पावले उचलली नाहीत. परिणामी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. 

सोशल पोलीस नावालाच nगृह विलगीकरणातील ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या रामभरोसे आहेत. त्यापैकी बहुतेक जण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. nअशा बाधितांवर वॉच ठेवण्यासाठी सोशल पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, हे सोशल पोलिसिंग केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. दोन हजारांच्या दंडासह फौजदारी कारवाईचा इशाराही कमी पडत आहे. 

प्रशासनाची अहवालांबाबत उदासीनताजानेवारी-फेब्रुवारीत लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रम धडाक्यात झाले. मॉल्स, दुकाने, पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. खासगी वाहनांतून लोकांचा प्रवास. ब्रिटनहून नागपूर-विदर्भात दाखल प्रवासी पॉझिटिव्ह येऊनही त्यांचा अहवाल देण्यास प्रशासनाने उदासीनता दाखवली.  

नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ८०० ते ९०० नवे रुग्ण दिसून येत आहेत.  

वाशिम जिल्ह्यात ४०० ते ५००, अकोल्यात ३५० ते ४५०, यवतमाळ जिल्ह्यात ४५० ते ५५०, अमरावती जिल्ह्यात २५० ते ३५०,  वर्धा जिल्ह्यात २०० ते २५०, वर्धा व भंडारा जिल्ह्यात १५० ते २००, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ५० ते ८० रुग्णांची नोंद होत आहे. 

टाळेबंदी, संचारबंदीनंतरही कोरोनाचा स्फोट होण्याची ही आहेत कारणे... कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने होत नसलेले ‘ट्रेसिंग’. ‘सैराट’ होऊन शहरात अनिर्बंध वावरत असलेले ‘होम आयसोलेशन’चे रुग्ण.दुसरी लाट येण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश.रस्त्यांवर, बाजारात गर्दी करणाऱ्या लोकांना मास्कचे गांभीर्य नसणे. सॅनिटायझरचा कमी झालेला वापर.सर्वात महत्त्वाचे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत बाळगलेली गुप्तता. 

ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटकडे दुर्लक्ष शनिवार व रविवार स्वयंस्फूर्त बंदचे आवाहन केले गेले. मात्र, इतर दिवशी गर्दीने फुललेल्या बाजारपेठा व विविध कार्यक्रमांकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आले. पण, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर