शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:12 IST

सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : १,०७१ पॉझिटिव्ह५२ बळीदिलासादायक, १०३६ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २२,२२५ तर मृतांची संख्या ८१४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हजारावर रुग्ण बाधित आढळून आले असले तरी १०३६ रुग्ण बरे झाले आहेत.नागपूर जिल्ह्यात कालपर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद दोन दिवसांपूर्वी, रविवारी झाली. ४६ मृत्यू झाले होते. परंतु आज मृत्यूसंख्येने नवा विक्रम गाठला. वाढत्या मृत्यू व रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज मेयोमध्ये १७ तर मेडिकलमध्ये १२ रुग्णांचे मृत्यू झाले. यात भंडारा येथील ५९ वर्षीय पुरुष, कामठी रोड येथील ५३ वर्षीय महिला, सुगत नगर येथील ७३ वर्षीय पुरुष, आदिवासी ले-आऊट वडधामना येथील ६८ वर्षीय पुरुष, झिंगाबाई टाकळी येथील ४७ वर्षीय पुरुष, नवीन खलासी लाईन कामठी येथील ६४ वर्षीय महिला, पटवर्धन अपार्टमेंट सीताबर्डी येथील ४७ वर्षीय पुरुष, सावित्री बाई फुले स्लम वसाहत पार्वतीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, बहादुरा दिघोरी येथील एक रुग्ण, धंतोली येथील ९५ वर्षीय महिला, सावनेर येथील ६३ वर्षीय महिला व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध झाली नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये ४६ शहरातील, चार ग्रामीण भागातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात ६१३, ग्रामीणमध्ये ११५ तर जिल्हाबाहेर ८६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.अर्धे रुग्ण खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्हआज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अर्धे रुग्ण खासगी लॅबमधील आहेत. ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणीत २११ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर आरटीपीसीआर चाचणीत एम्समध्ये १३१, मेडिकलमध्ये ५९, मेयोमध्ये १५९, नीरीमध्ये ५८ अशा एकूण १,०७१ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, १७६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली.बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्क्यांवरदिलासादायक म्हणजे, मागील आठवड्यात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांवर गेले असताना आज ते ५८.७९ टक्क्यांवर पोहचले आहे. १,०३६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या १३,०६८ वर पोहचली आहे. यात शहरातील ९,२०६ तर ग्रामीण भागातील ३,८६२ रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत ८,३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ६,६४२ तर ग्रामीणमधील १७०१ रुग्ण आहेत.दैनिक संशयित : ५,७६४बाधित रुग्ण : २२,२२५बरे झालेले : १३,०६८उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३४३मृत्यू : ८१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू