शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:12 IST

सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : १,०७१ पॉझिटिव्ह५२ बळीदिलासादायक, १०३६ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २२,२२५ तर मृतांची संख्या ८१४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हजारावर रुग्ण बाधित आढळून आले असले तरी १०३६ रुग्ण बरे झाले आहेत.नागपूर जिल्ह्यात कालपर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद दोन दिवसांपूर्वी, रविवारी झाली. ४६ मृत्यू झाले होते. परंतु आज मृत्यूसंख्येने नवा विक्रम गाठला. वाढत्या मृत्यू व रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज मेयोमध्ये १७ तर मेडिकलमध्ये १२ रुग्णांचे मृत्यू झाले. यात भंडारा येथील ५९ वर्षीय पुरुष, कामठी रोड येथील ५३ वर्षीय महिला, सुगत नगर येथील ७३ वर्षीय पुरुष, आदिवासी ले-आऊट वडधामना येथील ६८ वर्षीय पुरुष, झिंगाबाई टाकळी येथील ४७ वर्षीय पुरुष, नवीन खलासी लाईन कामठी येथील ६४ वर्षीय महिला, पटवर्धन अपार्टमेंट सीताबर्डी येथील ४७ वर्षीय पुरुष, सावित्री बाई फुले स्लम वसाहत पार्वतीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, बहादुरा दिघोरी येथील एक रुग्ण, धंतोली येथील ९५ वर्षीय महिला, सावनेर येथील ६३ वर्षीय महिला व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध झाली नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये ४६ शहरातील, चार ग्रामीण भागातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात ६१३, ग्रामीणमध्ये ११५ तर जिल्हाबाहेर ८६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.अर्धे रुग्ण खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्हआज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अर्धे रुग्ण खासगी लॅबमधील आहेत. ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणीत २११ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर आरटीपीसीआर चाचणीत एम्समध्ये १३१, मेडिकलमध्ये ५९, मेयोमध्ये १५९, नीरीमध्ये ५८ अशा एकूण १,०७१ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, १७६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली.बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्क्यांवरदिलासादायक म्हणजे, मागील आठवड्यात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांवर गेले असताना आज ते ५८.७९ टक्क्यांवर पोहचले आहे. १,०३६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या १३,०६८ वर पोहचली आहे. यात शहरातील ९,२०६ तर ग्रामीण भागातील ३,८६२ रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत ८,३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ६,६४२ तर ग्रामीणमधील १७०१ रुग्ण आहेत.दैनिक संशयित : ५,७६४बाधित रुग्ण : २२,२२५बरे झालेले : १३,०६८उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३४३मृत्यू : ८१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू