शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:12 IST

सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : १,०७१ पॉझिटिव्ह५२ बळीदिलासादायक, १०३६ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २२,२२५ तर मृतांची संख्या ८१४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हजारावर रुग्ण बाधित आढळून आले असले तरी १०३६ रुग्ण बरे झाले आहेत.नागपूर जिल्ह्यात कालपर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद दोन दिवसांपूर्वी, रविवारी झाली. ४६ मृत्यू झाले होते. परंतु आज मृत्यूसंख्येने नवा विक्रम गाठला. वाढत्या मृत्यू व रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज मेयोमध्ये १७ तर मेडिकलमध्ये १२ रुग्णांचे मृत्यू झाले. यात भंडारा येथील ५९ वर्षीय पुरुष, कामठी रोड येथील ५३ वर्षीय महिला, सुगत नगर येथील ७३ वर्षीय पुरुष, आदिवासी ले-आऊट वडधामना येथील ६८ वर्षीय पुरुष, झिंगाबाई टाकळी येथील ४७ वर्षीय पुरुष, नवीन खलासी लाईन कामठी येथील ६४ वर्षीय महिला, पटवर्धन अपार्टमेंट सीताबर्डी येथील ४७ वर्षीय पुरुष, सावित्री बाई फुले स्लम वसाहत पार्वतीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, बहादुरा दिघोरी येथील एक रुग्ण, धंतोली येथील ९५ वर्षीय महिला, सावनेर येथील ६३ वर्षीय महिला व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध झाली नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये ४६ शहरातील, चार ग्रामीण भागातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात ६१३, ग्रामीणमध्ये ११५ तर जिल्हाबाहेर ८६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.अर्धे रुग्ण खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्हआज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अर्धे रुग्ण खासगी लॅबमधील आहेत. ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणीत २११ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर आरटीपीसीआर चाचणीत एम्समध्ये १३१, मेडिकलमध्ये ५९, मेयोमध्ये १५९, नीरीमध्ये ५८ अशा एकूण १,०७१ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, १७६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली.बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्क्यांवरदिलासादायक म्हणजे, मागील आठवड्यात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांवर गेले असताना आज ते ५८.७९ टक्क्यांवर पोहचले आहे. १,०३६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या १३,०६८ वर पोहचली आहे. यात शहरातील ९,२०६ तर ग्रामीण भागातील ३,८६२ रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत ८,३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ६,६४२ तर ग्रामीणमधील १७०१ रुग्ण आहेत.दैनिक संशयित : ५,७६४बाधित रुग्ण : २२,२२५बरे झालेले : १३,०६८उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३४३मृत्यू : ८१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू