शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

CoronaVirus in Nagpur : बापरे! ४० मृत्यू : आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 23:49 IST

कोरोनाचे ओढवलेले संकट दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून मृतांची संख्या २६९ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे४५६ पॉझिटिव्ह : मृतांमध्ये १९वर्षीय तरुण, तरुणी : शहरात २६७ तर ग्रामीणमध्ये १८९ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे ओढवलेले संकट दिवसेंदिवस आणखीच गडद होत चालले आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून मृतांची संख्या २६९ वर पोहचली आहे. ४५६ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ७,७४७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांमध्ये १९ वर्षीय तरुण, तरुणी असून महिलांची संख्या लक्षणीय आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये २६७ शहरातील तर १८९ ग्रामीणमधील आहेत. आॅगस्ट महिन्यात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा भयावह पद्धतीने वाढत आहे. १ तारखेला १३, २ तारखेला १५, ३ तारखेला १८, ४ तारखेला १७, ५ तारखेला १५, ६ तारखेला २५ तर आज ४० वर गेला आहे. या सात दिवसात १४३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नऊ रुग्णांचे बळी गेले. यात कमाल चौक आनंदनगर कॉलनी येथील ६१ वर्षीय महिला, कामठी रोड येथील ६५ वर्षीय महिला, टेलिफोन एक्सचेंज चौक जुनी मंगळवारी येथील ४४ वर्षीय पुरुष, मिरे ले-आऊट नंदनवन येथील ५२ वर्षीय पुरुष, कन्हान पारशिवनी येथील ६३ वर्षीय पुरुष, कोलबास्वामी शांतीनगर येथील ५३ वर्षीय महिला, इतवारी येथील ६८ वर्षीय पुरुष, रामनगर कामठी येथील ४२ वर्षीय महिला व जरीपटका येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. मेडिकलमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यात नाईक तलाव येथील १९ वर्षीय तरुणी, नंदनवन येथील ४८ वर्षीय महिला, चंदननगर येथील १९ वर्षीय तरुण, ६६ वर्षीय महिला, ६८ वर्षीय महिला व ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना न्युमानिया, उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता. रेडिएन्सेन हॉस्पिटलमध्येही तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून उपलब्ध झाली नाही.मेयोमध्ये १३१ मृत्यूकोरोना प्रादुर्भावाच्या या पाच महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यू मेयोमध्ये झाले. १३१ मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर मेडिकलमध्ये ११६, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये चार, रेडिएन्सेन हॉस्पिटलमध्ये आठ, सेव्हनस्टार हॉस्पिटलमध्ये दोन, होप हॉस्पिटलमध्ये सहा व इतर ठिकाणी दोन असे २६९ मृत्यू झाले आहेत. दिलासादायक म्हणजे, आज २५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,३३७ झाली आहे. सध्या ३,१४१ रुग्ण उपचार घेत आहेत.दैनिक संशयित : ४९९बाधित रुग्ण : ७,७४७बरे झालेले : ४,३३७उपचार घेत असलेले रुग्ण : ३,१४१मृत्यू : २६९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूnagpurनागपूर