शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

"शासनाचा लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’च", नागपुरात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 13:05 IST

Coronavirus Nagpur : मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला.

नागपूर - राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेश हा व्यापाºयांसाठी ‘डेथ वारंट’च असल्याचे मत विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केले. ("Government's lockdown order is a 'death warrant' for traders", traders announce in Nagpur)मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला. यावरून व्यापारी आणि पोलिसांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. इतवारी चौकात व्यापाºयांनी एकत्रित येऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. शासनाने ३० एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने व्यापारी संकटात आले आहेत. शासनाने वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू ठेवायला हवी होती. पुढे सण आहेत. व्यापाºयांनी माल भरला आहे. त्याच्या रकमेची परतफेड करायची आहे. व्यापार बंद राहिल्यास परतफेड कशी करणार, असा सवाल आहे. त्यामुळे व्यापारी आणखी संकटात येणार असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, शासनाने लॉकडाऊनचा आदेश काढून व्यापा-यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. शुक्रवार रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. आदेशात सोमवार ते शुक्रवार रात्रीपर्यंत कडक निर्बंध लावली आहेत. या दिवसातही दुकाने बंद राहणार आहे. शासनाचा लॉकडाऊन आदेश हा व्यापा-यांसाठी ‘डेथ वारंट’च आहे. यामुळे अनेक व्यापारी आत्महत्या करतील. लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणी केल्यानंतर चेंबर पुढे आंदोलनाची रूपरेषा ठरविणार आहे. सणांच्या काळात लादलेला लॉकडाऊन व्यापाºयांच्या जीवावर बेतणार आहे. सरकारने आदेश मागे घ्यावा.सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, शासनाचा ३० एप्रिलपर्यंतचा दुकाने बंदचा आदेश व्यापाºयांसाठी घातक ठरणार आहे. आधी कोरोना संपणार का, आधी व्यापारी, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गुढीपाडव्याचा सण १३ एप्रिलला आहे. सर्वांनी दागिन्यांचे आॅर्डर दिले आहेत. आता त्याचे काय होणार, असा गंभीर प्रश्न आहे. सरकारची मदत नाहीपूर्वी लॉकडाऊनच्या काळात सरकारने व्यापाºयांना काहीही मदत केली नाही, उलट चक्रवाढ व्याज लावून कर्ज वसूल केले. शिवाय आयकर रिटर्नमध्येही काहीही सूट दिलेली नाही. विजेचे बील, कर्मचाºयांचा पगार, बॅकांचे हप्ते भरावे लागले. पुढेही अशीच स्थिती निर्माण होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर