शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

टंचाईच्या कामांना कोरोनाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:09 AM

नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात ...

नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. यातील बहुतांश कामे जून महिन्याच्या आत पूर्ण करावयाची आहेत. परंतु मे महिना सुरू झाला असताना अद्याप टंचाई आराखड्यातून कामेच सुरू झाली नसल्याचे दिसत आहे. टंचाईच्या कामाला कोरोनाची झळ बसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

नागपूर जिल्हा परिषदेने यावर्षी ५१.२६ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार केला. यात २,५८० कामे १,०२६ गावात प्रस्तावित करण्यात आले. टंचाईच्या कामात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, झिरे बुडक्या खोदणे आदी कामांचा समावेश आहे. ५१ कोटी रुपयाच्या आराखड्यापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी २१.५३ कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ४७५ गावांमध्ये यातील ६११ कामे होणार आहेत. परंतु सध्या १५ गावात १८ कामे प्रगतिपथावर आहेत. टंचाईच्या कामाची गती लक्षात घेता, पावसाळा सुरू झाल्यावरही टंचाईची कामे सुरूच राहील असे दिसत आहे. दुसरीकडे ग्रामस्थांकडून ओरड सुरू झाली आहे.

- सध्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक कामांवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांची सेवा जिल्हा प्रशासनाने कोरोनासाठी घेतली आहे. स्टॅम्प पेपर उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतशी टंचाईचे करार थांबले आहे. संचारबंदीची झळ टंचाईच्या कामाला बसली आहे.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.