शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४२ दिवसांनंतर मृत्यूची संख्या ५०च्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:00 IST

Corona Virus Death toll drops कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे, २४ एप्रिल रोजी हाच दर ३१ टक्क्यांहून अधिक होता. शनिवारी १५१० नव्या रुग्णांची तर, ४८ मृत्यूची नोंद झाली. ४२ दिवसांनंतर मृत्यूची संख्या ५०च्या खाली आली आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,६२,११० तर मृतांची संख्या ८,५२० झाली आहे.

ठळक मुद्दे१५१० नव्या रुग्णांची नोंद, ४८ मृत्यू : पॉझिटिव्हिटीचा दर १३ टक्क्यांवर

  लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे, २४ एप्रिल रोजी हाच दर ३१ टक्क्यांहून अधिक होता. शनिवारी १५१० नव्या रुग्णांची तर, ४८ मृत्यूची नोंद झाली. ४२ दिवसांनंतर मृत्यूची संख्या ५०च्या खाली आली आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,६२,११० तर मृतांची संख्या ८,५२० झाली आहे.

‘कडक निर्बंध’चे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यात ८ हजारांजवळ गेलेली रुग्णसंख्या आता दीड हजारांच्या घरात आली आहे. मागील १५ दिवसांत साधारण ५०० ते ३०० दरम्यान रोज रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. मृत्यूदरातही घट आली असून, सध्या १.८४ टक्के आहे. परंतु, चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्येवर याचा परिणाम तर होत नाही ना, अशी शंकाही बोलून दाखविली जात आहे. शनिवारी ११,६११ चाचण्या झाल्या. २२ मार्चनंतर पहिल्यांदाच कमी चाचण्या झाल्या आहेत. आज रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, ४,७८० रुग्ण बरे झाले. बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ४,२०,३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहर व ग्रामीणमध्ये सारखेच रुग्ण

आज शहर आणि ग्रामीणमध्ये जवळपास सारखेच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. शहरात ७७४ तर ग्रामीणमध्ये ७२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात २२ तर ग्रामीणमध्ये १४ रुग्णांचे मृत्यू झाले. धक्कादायक म्हणजे, ग्रामीणमध्ये रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ४७.३२ टक्के आहे. शहरात हाच दर कमी होऊन ७.६७ टक्क्यांवर आला आहे. यावरून ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाला अधिक काम करणे, विशेषत: चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ११,६११

एकूण बाधित रुग्ण : ४,६२,११०

सक्रिय रुग्ण : ३३,२५९

बरे झालेले रुग्ण : ४,२०,३३१

एकूण मृत्यू : ८,५२०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू