शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

यंदा नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया नृत्याला ब्रेक; अनेकांच्या आनंदावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 15:48 IST

जिल्ह्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे. (Navratri in Nagpur)

ठळक मुद्देकोरोनामुळे खबरदारी : गरबा, दांडिया आयोजित करू नये; प्रशासनाची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया नृत्याची नेहमीच धूम असते. वातावरण प्रसन्न दांडियाची मैदाने सजलेली आणि हातात सुंदर दांडिया धरून नटून-थटून पेहरावात आलेली मंडळी पाहण्याची मजा काही औरच असते. ए हालो म्हणत एकच जल्लोश सुरू असतो. मात्र, मागिल दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवातील आनंदावर विरजण आलं आहे. 

जिल्ह्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापूजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवरात्र उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

- अशा आहेत सूचना

-देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची ३ फूट मर्यादेत असावी

-घरातील धातू- संगमरवर या मूर्तीचे पूजन करावे. शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास घरी विसर्जन करावे.

- मूर्तीचे घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे.

- घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे.

- नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

- जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

-आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत जनजागृती करावी.

- गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे. साथरोग जसे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इतर आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.

देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात यावी.- आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

- मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी.

- देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

उत्साहावरील निर्बंध आवडण्यासारखे नाहीत मात्र, आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने हे नियम पाळलेच पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी वर दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे. जेणेकरून पुढील वर्षीचा प्रत्येक सण-उत्सव आपल्याला आनंदाने साजरा करता येईल.