शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कोरोना इफेक्ट; वैफल्यग्रस्तता अन् रोष वाढला; कुणावरही निघतो आहे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:57 IST

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे.

ठळक मुद्देकोरोनाने मोकळेपणाने जगण्याचा नैसर्गिक हक्क हिरावून घेतल्यासारखे झाले आहे. त्यामुळे सामाजिक नैराश्य आले आहे. व्यक्त होण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे कुणाकडचा राग कुणावर निघत आहे. त्याचमुळे घात, आत्मघातकी प्रकार वाढले आहेत. ---राजा आकाश  समुपदेशक, नागपूर.

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक महामारीच्या रूपात आलेल्या कोरोनाच्या प्रकोपाचे भयावह सामाजिक दुष्परिणाम सर्वत्र उमटू लागले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे.

पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला घरगुती कारणावरून बोलल्यामुळे आत्महत्या केल्याच्या अनेक घटना गेल्या तीन आठवड्यात नागपुरात घडल्या आहेत. या घटनांची पार्श्वभूमी जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कोरोनामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लाखो जणांची तीव्र आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. परिणामी सर्वत्र चिडचीड, वाद वाढले आहेत. भावनिक आगडोंब उसळत असल्याने छोट्या छोट्या कारणावरून कुणी कुणाचा जीव घेत आहे तर कुणी स्वत:चा जीव देत आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नागपुरात गेल्या तीन महिन्यात ११५ जणांनी आत्महत्या केली. यात नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि सर्वच स्तरातील व्यक्ती, तरुण, तरुणीचा समावेश आहे. यातील ७० आत्महत्येच्या घटना या आर्थिक कोंडी अन् त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तसेच चिडचिडेपणामुळे झाल्या आहेत. दुसरीकडे किरकोळ कारणावरून एकमेकांची हत्या केल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे जगण्यावर बंधने आली आहेत. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, मनासारखे खाणे, घेणे बंद झाले आहे. एवढेच नव्हे तर कुठे जाता येत नाही. अर्थात, मोकळेपणाने फिरणेही बंद झाले आहे. या एकूणच प्रकारामुळे अनेकांना प्रचंड नैराश्य आले असून त्यातून आक्रित घडत आहे. खालील काही घटनांवरून त्याची प्रचिती यावी.

नंदनवन परिसरात बुधवारी रात्री अगदीच किरकोळ कारणामुळे आरोपी बंडू टापरेने शेजारच्या आरती नितीन गिरडकर नामक महिलेची भीषण हत्या केली. या आरोपीचा कोणताही गुन्हेगारी अहवाल नाही.मंगळवारी २३ जूनला धंतोलीत एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला झोपेत तोंडावर हात पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.स्वत:चे व्यापारी संकुल असलेल्या पारडीतील मेहर नामक व्यापारी बंधूंनी ७ जूनला दारूच्या नशेत गुन्हेगार दुकानासमोरून हटत नसल्याने त्याचा मुडदा पाडला. लकडगंजमध्ये पुरी खायला दिली नाही म्हणून रोजमजुरी करणाऱ्या  एकाने दोन मजुरांची हत्या केली.पत्नी आधीसारखी लक्ष देत नसल्यामुळे ३० मे रोजी पोलीस महिलेच्या पतीने तहसीलमध्ये आत्महत्या केली.फेसबुकवर चॅटिंग करताना हमरीतुमरीवर आलेल्या दोघांनी ५ जूनला एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला.पुण्यात एमआयटीत शिकणाऱ्या धंतोलीतील एका सुखवस्तू कुटुंबातील आणि घरात लाडकी असलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.आर्थिक कोंडी झाल्याने सदरमध्ये केटरिंग व्यावसायिकाने २१ जूनला आत्महत्या केली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस