शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

कोरोनामुळे विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कारवाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 8:23 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे २९ इमारती धोकादायक : इमारतींवर लवकरच कारवाई होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली. उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण होत असल्याचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्राप्त झाला आहे, हे विशेष.अधिकारी म्हणाले, एमआयएलने दोन वर्षांपूर्वीच एका एजन्सीमार्फत विमानतळालगतच्या उंच इमारतींची पाहणी केली होती. कोणत्या इमारती धोकादायक आहेत, याचा अहवाल तयार करून डीजीसीएला पाठविला आहे. इमारतींवर कारवाई करण्याची प्रक्रिया मोठी आहे. या अंतर्गत इमारतींच्या मालकांना नोटीस देणे, स्वत: कारवाई करणे, मनपाच्या अधिकाºयांसोबत चर्चा करणे, डीजीसीएला अहवाल देणे आणि त्यांच्याकडून आदेश येणे आणि नंतरच कारवाई करणे ही प्रक्रिया आहे. यात वेळ लागणार आहे. नोटीस दिल्यानंतर इमारतींच्या मालकांकडून इमारत तोडण्यासाठी कारवाई सुरू आहे का, याची पाहणी सुरू करण्यात येणार होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा पाहणी करून डीजीसीएला अहवाल देण्यात येणार आहे.विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे. या गंभीर समस्येवर एमआयएल आणि मनपाच्या अधिकाºयांमध्ये पूर्वी बैठक झाली आहे. उंचीचे उल्लंघन केलेल्या इमारतींचे बांधकाम तोडण्यात येण्यावर बैठकीत ठरले. विमानतळ परिसराच्या ठराविक अंतरावर बांधकाम करण्यात येणाºया इमारतींसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. प्राधिकरणाने विमानतळालगतच्या परिसरात इमारत बांधण्यासाठी उंची ठरवून दिली आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. उंचीसाठी मालकाने प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली नाही. आता त्या विमानासाठी धोकादायक ठरल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळालगतच्या उंच इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विमानतळ प्राधिकरणासह खासगी कंपनीतर्फेही इमारतींचे सर्वेक्षण करून एमआयएल आणि डीजीसीएला अहवाल सादर केला आहे. पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. मर्यादेपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामाला प्राधिकरणाने परवानगी दिलीच नाही. अशा स्थितीत कारवाईसाठी प्राधिकरणाचे अधिकारी कुणाची वाट पाहत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेता येणार आहे.कारवाई होणारचविमानतळालगत उभ्या असलेल्या उंच इमारतींवर कारवाई करण्यात कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. या इमारतींचा अहवाल डीजीसीएकडे पाठविला आहे. इमारतींचे मालक स्वत: काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे. पण या सर्व इमारतींवर कारवाई निश्चितच होणार आहे.आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर