शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

युवक काँग्रेसमधील वादावर पडदा, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मोरे यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:47 IST

गटबाजी संपविण्यावर भर : कुणाल राऊत यांचा कार्यकाळ झाला होता पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक काँग्रेसमध्ये उफाळलेल्या गटबाजीवर उपाय म्हणून शिवराज मोरे यांच्या हाती युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी या संबंधीची घोषणा शुक्रवारी केली. मावळते अध्यक्ष कुणाल राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राऊत यांची प्रदेश कार्यकारिणीत महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळीच युवक काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, याचे संकेत मिळाले होते.

कराड (सातारा जिल्हा) येथील शिवराज मोरे यांनी एनएसयूआयच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. २०१० ते २०१४ या काळात ते एनएसयूआय महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत, नतर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविली होती. कुणाल राऊत यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात युवक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. गटबाजीतून ६० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी निलंबित पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली होती. शेवटी शिवराज मोरे यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक करून असंतुष्ट गटाला आधार देण्यात आला होता. कुणाल राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. पण, सततच्या गटबाजीमुळे शेवटी राऊत यांना पदमुक्त करीत प्रदेश काँग्रेसमध्ये महासचिव नेमण्यात आले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करीत गटबाजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

कार्यकारिणीतही लवकरच फेरबदलयुवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर लवकरच कार्यकारिणीतही फेरबदल केला जाणार आहे. नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरे यांना पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. पक्षाचे राज्यातील नेते व युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून नवी कार्यकारिणी तयार केली जाणार आहे.

निवडणूक पद्धत बंद झाली का ?यापूर्वी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी निवडण्यासाठी राज्यभर निवडणूक घेण्यात आली होती. कुणाल राऊत हे सर्वाधिक मते घेत प्रदेशाध्यक्ष झाले होते. मात्र, आता शिवराज मोरे यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पदाधिकारी निवडण्याची पद्धत बंद करण्यात आली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर