शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

युवक काँग्रेसमधील वादावर पडदा, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मोरे यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:47 IST

गटबाजी संपविण्यावर भर : कुणाल राऊत यांचा कार्यकाळ झाला होता पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक काँग्रेसमध्ये उफाळलेल्या गटबाजीवर उपाय म्हणून शिवराज मोरे यांच्या हाती युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी या संबंधीची घोषणा शुक्रवारी केली. मावळते अध्यक्ष कुणाल राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राऊत यांची प्रदेश कार्यकारिणीत महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळीच युवक काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, याचे संकेत मिळाले होते.

कराड (सातारा जिल्हा) येथील शिवराज मोरे यांनी एनएसयूआयच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. २०१० ते २०१४ या काळात ते एनएसयूआय महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत, नतर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविली होती. कुणाल राऊत यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात युवक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. गटबाजीतून ६० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी निलंबित पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली होती. शेवटी शिवराज मोरे यांची कार्याध्यक्षपदी नेमणूक करून असंतुष्ट गटाला आधार देण्यात आला होता. कुणाल राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. पण, सततच्या गटबाजीमुळे शेवटी राऊत यांना पदमुक्त करीत प्रदेश काँग्रेसमध्ये महासचिव नेमण्यात आले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करीत गटबाजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

कार्यकारिणीतही लवकरच फेरबदलयुवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर लवकरच कार्यकारिणीतही फेरबदल केला जाणार आहे. नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरे यांना पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. पक्षाचे राज्यातील नेते व युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून नवी कार्यकारिणी तयार केली जाणार आहे.

निवडणूक पद्धत बंद झाली का ?यापूर्वी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी निवडण्यासाठी राज्यभर निवडणूक घेण्यात आली होती. कुणाल राऊत हे सर्वाधिक मते घेत प्रदेशाध्यक्ष झाले होते. मात्र, आता शिवराज मोरे यांची थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पदाधिकारी निवडण्याची पद्धत बंद करण्यात आली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर