शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

युवक काँग्रेसचा वाद पेटला, अध्यक्षांविरोधात पदाधिकारी सरसावले

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2024 19:46 IST

राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार : राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याचा आरोप

कमलेश वानखेडे, नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीचे दोन टप्पे आटोपले असताना युवक काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. निष्क्रियतेचा ठपका ठेवत युवक काँग्रेसच्या ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आता युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. नागपूर व रामटेक लोकसभेत निष्क्रिय राहिलेले कुणाल राऊत यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याकडे केली आहे.

युवक काँग्रेसच्या ज्या ४९ पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला त्यातील अनेकजण जन्मताच काँग्रेसमध्ये राहिले आहेत. काहींनी आपल्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची सुरुवात काँग्रेसपासून केली आहे. मात्र भेदभाव करत राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याची पदाधिकाऱ्यांची भावना झाली आहे. जो नियम इतरांना तो प्रदेश अध्यक्षांना का नाही, संघटनेत विधानसभा अध्यक्षांपासून ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्वांना समान नियम असून त्यांनी देखील या संदर्भात कुठलेच काम केले नसताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई का नाही, असा सवाल करीत या पदाधिकाऱ्यांनी आता स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. संबंधित नोटीस बजावून पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी काम केले असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमची प्रतिमा मलिन करण्याचा डाव रचण्यात आला, याची दखल घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

निवडणूक काळात विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. नोटीस बजावण्यापूर्वी कामाचा अहवाल मागायचा असतो. त्याने समाधान न झाल्यास कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची संघटनेची पद्धत आहे. मात्र या ठिकाणी राजकीय आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नोटीस काढणाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याकडे केली आहे.

उमेदवारांकडूनच घेतले काम केल्याचे पत्र

लोकसभा निवडणुकीत अमुक पदाधिकाऱ्याने पक्षाचे काम केले आहे, याची हमी देणारे पत्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडूनच घेतले आहे. आ. विकास ठाकरे, श्यामकुमार बर्वे यांच्यासह विदर्भातील उमेदवारांनी संबंधित पत्र दिले आहेत. हे सर्व पत्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार आहेत.

प्रदेश प्रभारींकडून सारवासारव

पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत उत्तम काम केले आहे. कुणीही पक्षाच्या विरोधात काम केले नाही, असे पत्र काढत प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानु यांनी आता या प्रकरणावर सावरासावर केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४