शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

युवक काँग्रेसचा वाद पेटला, अध्यक्षांविरोधात पदाधिकारी सरसावले

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2024 19:46 IST

राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार : राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याचा आरोप

कमलेश वानखेडे, नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीचे दोन टप्पे आटोपले असताना युवक काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. निष्क्रियतेचा ठपका ठेवत युवक काँग्रेसच्या ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आता युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. नागपूर व रामटेक लोकसभेत निष्क्रिय राहिलेले कुणाल राऊत यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याकडे केली आहे.

युवक काँग्रेसच्या ज्या ४९ पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला त्यातील अनेकजण जन्मताच काँग्रेसमध्ये राहिले आहेत. काहींनी आपल्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची सुरुवात काँग्रेसपासून केली आहे. मात्र भेदभाव करत राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याची पदाधिकाऱ्यांची भावना झाली आहे. जो नियम इतरांना तो प्रदेश अध्यक्षांना का नाही, संघटनेत विधानसभा अध्यक्षांपासून ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्वांना समान नियम असून त्यांनी देखील या संदर्भात कुठलेच काम केले नसताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई का नाही, असा सवाल करीत या पदाधिकाऱ्यांनी आता स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. संबंधित नोटीस बजावून पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी काम केले असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमची प्रतिमा मलिन करण्याचा डाव रचण्यात आला, याची दखल घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

निवडणूक काळात विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. नोटीस बजावण्यापूर्वी कामाचा अहवाल मागायचा असतो. त्याने समाधान न झाल्यास कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची संघटनेची पद्धत आहे. मात्र या ठिकाणी राजकीय आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नोटीस काढणाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याकडे केली आहे.

उमेदवारांकडूनच घेतले काम केल्याचे पत्र

लोकसभा निवडणुकीत अमुक पदाधिकाऱ्याने पक्षाचे काम केले आहे, याची हमी देणारे पत्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडूनच घेतले आहे. आ. विकास ठाकरे, श्यामकुमार बर्वे यांच्यासह विदर्भातील उमेदवारांनी संबंधित पत्र दिले आहेत. हे सर्व पत्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार आहेत.

प्रदेश प्रभारींकडून सारवासारव

पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत उत्तम काम केले आहे. कुणीही पक्षाच्या विरोधात काम केले नाही, असे पत्र काढत प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानु यांनी आता या प्रकरणावर सावरासावर केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४